शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वाघ, हरीण व बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 22:22 IST

वन विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून वैशाख पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून प्राणी गणना केली जात आहे. यंदाही १९ मे रोजीच्या रात्री चंद्राच्या नितळ व शुभ्र प्रकाशात वैरागड परिसरात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी आरमोरी वन परिक्षेत्रात वाघ, हरीण, निलगाय व बिबट्याचे दर्शन झाले असून यावर्षात वन्यजीवांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.

ठळक मुद्देप्राणी गणना : आरमोरीत वन परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत कमालीची घट

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून वैशाख पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून प्राणी गणना केली जात आहे. यंदाही १९ मे रोजीच्या रात्री चंद्राच्या नितळ व शुभ्र प्रकाशात वैरागड परिसरात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी आरमोरी वन परिक्षेत्रात वाघ, हरीण, निलगाय व बिबट्याचे दर्शन झाले असून यावर्षात वन्यजीवांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील रवी, अरसोडा, सुकाळा व इतर काही ठिकाणच्या जंगलात पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका पाणवठ्यावर व्याघ्रदर्शन झाले. तर काही ठिकाणी हरीण, निलगाय, तसेच बिबट्याचे दर्शन झाले. रात्री पाणवठ्यावर तहाण भागविण्यासाठी येणाºया वन्यप्राण्यांमध्ये रानडुकरांचा समावेश होता, असा वन विभागाच्या गणना नोंदणीत उल्लेख आहे. वन विभागाच्या वतीने यापूर्वी झालेल्या प्राणी गणनेत सरपटणारे वन्यजीव, तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी होती. पण यंदा ससे, घोरपड, मोर, मुंगूस या वन्यजीवांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे दिसून आले. जंगल परिसरात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे तसेच वृक्षतोडीमुळे जंगल क्षेत्र कमी झाल्याने प्राण्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे.वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यातगडचिरोली जिल्ह्यात भामरागड, आलापल्ली, सिरोंचा, वडसा व गडचिरोली हे पाच वन विभाग असून ७८ टक्के जंगल आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून या राखीव जंगलात विविध कारणामुळे वृक्षतोड सुरू आहे. शिवाय जंगलातील पाणी स्त्रोताची पाणी पातळी खालावल्यामुळे वन्यप्राणी आपली तहाण भागविण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. याचा फायदा काही शिकारी लोक घेत आहेत. वन्यजीवांची अन्न साखळी व निवासस्थाने मानवांकडून हिसकाविण्यात आल्याने वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अवैध शिकार प्रकारामुळेही काही वन्यजीवांचे बळी गेले आहेत. वन विभाग व नागरिकांच्या वतीने वन्यप्राणी संरक्षणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा वन्यजीवांचे दर्शन दुर्मिळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वन्यप्राणी, वन व जैविक विविधतेवर प्रतिकूल परिणाम करणारी कृती थांबविण्यासाठी वन विभागासोबत नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत जंगल व जंगलातील वन्यजीवांचे रक्षण करणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. एकदा नष्ट झालेले वने व वन्यप्राणी परत आणू शकणार नाही.- सचिन डोंगरवार,वन परिक्षेत्राधिकारी आरमोरी

टॅग्स :forestजंगलtourismपर्यटन