शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

वाहन कालव्यात कोसळले; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:18 IST

भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे१३ वºहाडी गंभीर जखमी : कन्नमवार जलाशयाच्या १५ फूट खोल कालव्यात घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.मुकुंदा दिवाकर वासेकर (४५) रा. सिमतळा, तुळशीराम शिवा बुरांडे (५५) रा. इटोली, सुषमा बुरांडे (३५) रा. इटोली जिल्हा चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पार्वता देवतळे (७०), श्यामसुंदर देवतळे (४०), सावित्रीबाई वासेकर (६०), बापुजी देवतळे (७०) सर्व रा. इटोली, भागवती दुधबळे (६५) रा. मानोरा, राजू पिंपरे (४०) रा. बल्हारशहा हे गंभीर जखमी आहेत. यापैकी काहींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ताराबाई देवतळे (६५), संगीता देवतळे (४०), रामदेव पिपरे (५०), बापुजी देवतळे (७०), विमल चलाख (४५) सर्व रा. इटोली, माधुरी वासेकर (३०) रा. सिमतळा, आनंदाबाई वासेकर (७०) रा. सुशी यांच्यावर ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरू आहेत.या वाहनात जवळपास २५ वºहाडी होते. १५ फुट खोल असलेल्या नहरात भरधाव वेगाने असलेले वाहने कोसळले व ते उलटलेसुद्धा यामध्ये बरेचशे वºहाडी वाहनाच्या बाहेर फेकल्या गेले. नहरात असलेल्या दगडांना आदळून काही जणांच्या कंबर, डोके, कपाळाला मार लागला आहे.बल्हारशहा तालुक्यातील इटोली येथील उमाजी देवतळे यांच्या मुलीचा विवाह चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील देवराव वासेकर यांच्या मुलासोबत गुरूवारी पार पडला. लग्न ओटोपून वरात एमएच ३४ बी जी ०५८५ क्रमांकाच्या महेंद्रा बोलोरे पीकअप वाहनाने चामोर्शीकडून इटोलीकडे जाण्यासाठी निघाली असता, भिवापूर गावाजवळील दिना नहरात वाहन उलटले. भिवापूर गावाजवळ नहरावर पूल आहे. या पुलाजवळ वळण आहे. भरधाव वेगाने असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलावरून वाहन न जाता सरळ नाल्यात जाऊन कोसळले व उलटले.मालवाहू वाहनाने प्रवासी वाहतूक वाढलीलग्नसराईच्या कालावधीत वरात नेण्यासाठी प्रामुख्याने मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. मालवाहू वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अवैध असले तरी या वाहनांचा वापर होतो. उभे राहून प्रवाशी प्रवास करतात. वरून कोणतेही संरक्षण राहत नसल्याने वाहन उलटल्यावर प्रवाशी मृत्यूमुखी पडतात. विशेष म्हणजे, बुधवारी कोडसेपल्लीत दोन वाहनांची धडक होऊन चार जणांचा बळी गेला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू