शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

वाहन कालव्यात कोसळले; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:18 IST

भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे१३ वºहाडी गंभीर जखमी : कन्नमवार जलाशयाच्या १५ फूट खोल कालव्यात घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : भिवापूर जवळील कन्नमवार जलाशयाच्या नहरात बोलोरे पीकअप वाहन कोसळून ३ जण ठार तर १३ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.मुकुंदा दिवाकर वासेकर (४५) रा. सिमतळा, तुळशीराम शिवा बुरांडे (५५) रा. इटोली, सुषमा बुरांडे (३५) रा. इटोली जिल्हा चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत. गंभीर जखमींमध्ये पार्वता देवतळे (७०), श्यामसुंदर देवतळे (४०), सावित्रीबाई वासेकर (६०), बापुजी देवतळे (७०) सर्व रा. इटोली, भागवती दुधबळे (६५) रा. मानोरा, राजू पिंपरे (४०) रा. बल्हारशहा हे गंभीर जखमी आहेत. यापैकी काहींना गडचिरोली तर काहींना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ताराबाई देवतळे (६५), संगीता देवतळे (४०), रामदेव पिपरे (५०), बापुजी देवतळे (७०), विमल चलाख (४५) सर्व रा. इटोली, माधुरी वासेकर (३०) रा. सिमतळा, आनंदाबाई वासेकर (७०) रा. सुशी यांच्यावर ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे उपचार सुरू आहेत.या वाहनात जवळपास २५ वºहाडी होते. १५ फुट खोल असलेल्या नहरात भरधाव वेगाने असलेले वाहने कोसळले व ते उलटलेसुद्धा यामध्ये बरेचशे वºहाडी वाहनाच्या बाहेर फेकल्या गेले. नहरात असलेल्या दगडांना आदळून काही जणांच्या कंबर, डोके, कपाळाला मार लागला आहे.बल्हारशहा तालुक्यातील इटोली येथील उमाजी देवतळे यांच्या मुलीचा विवाह चामोर्शी तालुक्यातील भिवापूर येथील देवराव वासेकर यांच्या मुलासोबत गुरूवारी पार पडला. लग्न ओटोपून वरात एमएच ३४ बी जी ०५८५ क्रमांकाच्या महेंद्रा बोलोरे पीकअप वाहनाने चामोर्शीकडून इटोलीकडे जाण्यासाठी निघाली असता, भिवापूर गावाजवळील दिना नहरात वाहन उलटले. भिवापूर गावाजवळ नहरावर पूल आहे. या पुलाजवळ वळण आहे. भरधाव वेगाने असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलावरून वाहन न जाता सरळ नाल्यात जाऊन कोसळले व उलटले.मालवाहू वाहनाने प्रवासी वाहतूक वाढलीलग्नसराईच्या कालावधीत वरात नेण्यासाठी प्रामुख्याने मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. मालवाहू वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अवैध असले तरी या वाहनांचा वापर होतो. उभे राहून प्रवाशी प्रवास करतात. वरून कोणतेही संरक्षण राहत नसल्याने वाहन उलटल्यावर प्रवाशी मृत्यूमुखी पडतात. विशेष म्हणजे, बुधवारी कोडसेपल्लीत दोन वाहनांची धडक होऊन चार जणांचा बळी गेला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू