शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

वैरागडात स्वच्छता अभियानाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड येथील ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत १० ...

ठळक मुद्देरस्त्यांवर कचऱ्याचे ढीग : गटारे, रस्ते देखभालीवर १० महिन्यांत तीन लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड येथील ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत १० महिन्यांत गटारे, रस्ते देखभालीच्या कामावर तीन लाख रूपयांचा खर्च केला आहे. मात्र गावाच्या सीमेलगतच्या दोन रस्त्यावर कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य आहे. स्वच्छता अभियानाचा वैरागड गावात फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.येथील महात्मा फुले चौक ते आदीशक्ती माता रोड आणि गाडे मोहल्ल्यातून मेंढा, वडेगावकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला कचºयाचे व शेणखताचे मोठे ढिगारे असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.करपडा मार्गावर अंकूर आश्रमशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर परिसरातील कुटुंबीय आपल्या घरातील केरकचरा व गुरांचे शेण शाळेसमोर नेऊन टाकतात. त्यामुळे सदर निवासी शाळेत राहणाºया विद्यार्थ्यांचे आरोग्य धोेक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर तोंडी सूचनाही दिली. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. ग्रामपंचायतीने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. ग्रामपंचायत चौकापासून पुढे मेंढा, वडेगाव या गावाला जाणाºया बायपास मार्गावर पीतांबर लांजेवार यांच्या मालकीच्या बोळीलगत काही लोकांनी शेणाचे ढीग अगदी रस्त्यावर टाकले आहेत. सदर रस्त्याने पायदळ चालणे देखल अडचणीचे झाले आहे. हा रस्ता गोरजाई मंदिराकडे जाणारा आहे. जानेवारी महिन्यात येथील गोरजाई मंदिरात यात्रा भरते. या यात्रेला पूर्वविदर्भातील माना समाज बांधव हजारोंच्या संख्येने दाखल होतात. सदर माना समाजाच्या भाविकांसाठी सोयीचे व्हावे, याकरिता सदर मार्गावरील शेणखत व कचºयाचे ढीग नष्ट करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.वैरागड येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेमध्ये रस्ते, नाली व स्वच्छतेच्या प्रश्नावर चर्चा केली जाते. वारंवार पाठपुरावाही केला जातो, मात्र गावातील विविध समस्या मार्गी लावण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असते, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.ग्रामपंचायत चौकातून कढोलीकडे जाणाऱ्या बायपास मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून आता वडेगाव-मेंढा बायपास मार्गाच्या स्वच्छतेचे काम ग्रामपंचायतीमार्फत हाती घेण्यात येईल. रस्त्यावरील शेणखत व कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावून रस्ते मोकळे केले जातील. तसे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे.- एन.जी.घुटके, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रा.पं. वैरागड

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली