शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:34 IST

महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.

ठळक मुद्देकृषी तंज्ज्ञांचे आवाहन : कासवी येथे कृषी कल्याण अभियानांतर्गत जाणीव-जागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २ आॅक्टोबर २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावात कृषी कल्याण अभियान-२ राबविले जात आहे. याअंतर्गत शेतकºयांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याकरिता तालुक्यातील कासवी येथे शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, विषय विशेषतज्ज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ.विक्रम कदम, पशुविकास अधिकारी डॉ.यू.एल.कारने, कृषी सहायक डी.के.क्षिरसागर, कृषी पर्यवेक्षक ए.आर.हुकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.डी.रहांगडाले, ग्रा.पं.सदस्य शेषराव कुमरे, पोलीस पाटील बाळकृष्ण सडमाके, वामन मरस्कोल्हे उपस्थित होते.डॉ.विक्रम कदम यांनी पशुसंवर्धन, कुकुटपालन ही काळाची गरज आहे. शेतकºयांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पुरक व्यवसाय करावा, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी दुधाळ गायींना चारा म्हणून नेपीअर फुले, जयवंत चारा पिकाची लागवड करावी, जनावरांचे लसीकरण करून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ गायींची जोपासणा करावी, असे आवाहन केले. ज्ञानेश्वर ताथोड यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले.पुष्पक बोथीकर यांनी मशरूम, मधमाशीपालन व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.यू.एल.कारने, डी.के.क्षिरसागर यांनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागामार्फत प्राथिनिधिक स्वरूपात कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र