शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:34 IST

महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.

ठळक मुद्देकृषी तंज्ज्ञांचे आवाहन : कासवी येथे कृषी कल्याण अभियानांतर्गत जाणीव-जागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : महागाई व उत्पादन खर्च वाढल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. शेतीत अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २ आॅक्टोबर २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावात कृषी कल्याण अभियान-२ राबविले जात आहे. याअंतर्गत शेतकºयांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याकरिता तालुक्यातील कासवी येथे शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ (कृषी अभियांत्रिकी) ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, विषय विशेषतज्ज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) डॉ.विक्रम कदम, पशुविकास अधिकारी डॉ.यू.एल.कारने, कृषी सहायक डी.के.क्षिरसागर, कृषी पर्यवेक्षक ए.आर.हुकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.डी.रहांगडाले, ग्रा.पं.सदस्य शेषराव कुमरे, पोलीस पाटील बाळकृष्ण सडमाके, वामन मरस्कोल्हे उपस्थित होते.डॉ.विक्रम कदम यांनी पशुसंवर्धन, कुकुटपालन ही काळाची गरज आहे. शेतकºयांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पुरक व्यवसाय करावा, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी दुधाळ गायींना चारा म्हणून नेपीअर फुले, जयवंत चारा पिकाची लागवड करावी, जनावरांचे लसीकरण करून कृत्रिम रेतनाद्वारे दुधाळ गायींची जोपासणा करावी, असे आवाहन केले. ज्ञानेश्वर ताथोड यांनी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, कृषी प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले.पुष्पक बोथीकर यांनी मशरूम, मधमाशीपालन व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.यू.एल.कारने, डी.के.क्षिरसागर यांनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागामार्फत प्राथिनिधिक स्वरूपात कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र