शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 13:08 IST

अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. तर, ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे.

ठळक मुद्देहजाराे हेक्टरवरील पीक नष्ट नुकसान भरपाई देण्याची मागणी

गडचिराेली : ऐन धान कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. नाेव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात झाली हाेती. आतापर्यंत धान कापणीचे काम आटाेपून मळणीला सुरुवात झाली असती. मात्र पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे.

विशेष म्हणजे सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे बांधणीची कामेसुद्धा थांबली आहेत. पावसामुळे तांदूळ काळा पडून अतिशय कमी भाव येणार आहे. कुजलेली तणीस जनावरे खात नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

पेरणी, रोवणी, खते, कीटकनाशके यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. कापणीचाही खर्च खेतकऱ्यांवर बसला आहे. ऐन धान घरी येण्याच्या वेळेवर असे नुकसान झाल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

पंचनामे करताना दमछाक

पिकाचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करण्याची जबाबदारी कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाची राहते. जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करताना कर्मचाऱ्यांची दमछाक हाेत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक आहेत. काही शेतकऱ्यांची बांधणी झाल्यानंतर पंचनामे हाेत आहेत. पंचनाम्यांचे काम आटाेपून लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

बाेंडातील कापुसही पडले काळे

चामाेर्शी, मुलचेरा, सिराेंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये माेठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मागील आठ दिवसांपासून अधून-मधून पडत असलेल्या पावसामुळे बाेंडातील कापूस काळा पडला आहे. काही कापूस जमिनीवर पडल्याने ते मातीमाेल झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांबराेबरच कापुस उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस