शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या ताेंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 13:08 IST

अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. तर, ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे.

ठळक मुद्देहजाराे हेक्टरवरील पीक नष्ट नुकसान भरपाई देण्याची मागणी

गडचिराेली : ऐन धान कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने जिल्हाभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पिकाचे माेठे नुकसान हाेत आहे. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. नाेव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून धान कापणीला सुरुवात झाली हाेती. आतापर्यंत धान कापणीचे काम आटाेपून मळणीला सुरुवात झाली असती. मात्र पावसामुळे काही शेतकऱ्यांनी धान कापणी थांबविली आहे. ज्या शेतकऱ्यांनी धान कापले त्यांच्या बांध्यांमध्ये पाणी साचून धान पीक कुजत आहे. काही शेतकऱ्यांचे धान अंकुरले आहे.

विशेष म्हणजे सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे बांधणीची कामेसुद्धा थांबली आहेत. पावसामुळे तांदूळ काळा पडून अतिशय कमी भाव येणार आहे. कुजलेली तणीस जनावरे खात नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांसमाेर निर्माण झाला आहे.

पेरणी, रोवणी, खते, कीटकनाशके यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. कापणीचाही खर्च खेतकऱ्यांवर बसला आहे. ऐन धान घरी येण्याच्या वेळेवर असे नुकसान झाल्याने काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

पंचनामे करताना दमछाक

पिकाचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करण्याची जबाबदारी कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाची राहते. जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करताना कर्मचाऱ्यांची दमछाक हाेत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे शिल्लक आहेत. काही शेतकऱ्यांची बांधणी झाल्यानंतर पंचनामे हाेत आहेत. पंचनाम्यांचे काम आटाेपून लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

बाेंडातील कापुसही पडले काळे

चामाेर्शी, मुलचेरा, सिराेंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये माेठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. मागील आठ दिवसांपासून अधून-मधून पडत असलेल्या पावसामुळे बाेंडातील कापूस काळा पडला आहे. काही कापूस जमिनीवर पडल्याने ते मातीमाेल झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांबराेबरच कापुस उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस