शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

मोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:31 AM

तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.

ठळक मुद्दे९० वर्षांची परंपरा कायम : टाळीसाठी गावातील नागरिकांचे पाळले गट

पुरूषोत्तम भागडकर।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुकास्थळापासून १० किमी अंतरावर असलेल्या मोहटोला गावात नवरात्र दरम्यान अखंडटाळ नाद या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे मागील ९० वर्षांपासून ही परंपरा गावकऱ्यांनी जोपासली आहे.मोहटोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार अंगिकारणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तालुक्यात मोहटोला या गावाला गुरूदेवांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. नवरात्रीच्या पावनपर्वावर शहरापासून खेड्यापर्यंत शारदा, दुर्गांची प्रतिष्ठापना केली जाते. डोळे दीपवून टाकणारी लाईटिंग व विविध देखावे यामुळे शारदा व दुर्गा उत्सवादरम्यान गाव खेड्यात गर्दी जमते. परंतु मोहटोला या गावात मात्र कोणत्याही देवीची प्रतिष्ठापना न करताना नवरात्रीदरम्यान ब्रह्मनाद टाळी सात दिवस सुरू राहते.गावातील हनुमान मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी घटपूजा करून अखंडटाळीला सुरुवात होते. ती अखंडटाळी रात्रंदिवस सतत सुरू राहणार, यासाठी गावकºयांचे काही गट पाळण्यात आले आहेत. त्यांचे वेळापत्रक तयार करून संबंधित गटाला देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक गटाला स्वयंस्पूर्तीने अखंडटाळीसाठी तीन तासांचा वेळ ठरवून दिलेला आहे. तो गट आपल्या वेळेला उपस्थित राहून सेवा देत आहे. अखंडनाद टाळीसाठी गावकºयांसोबतच जवळपासच्या परिसरातील डोंगरगाव (हलबी), चिखली, रिठ, नैनपूर, देसाईगंज, पिंपळगाव (हलबी), पोटगाव येथील भजन मंडळी सुद्धा उपस्थित राहून अखंडटाळ देत आहेत. बाहेर गावावरून आलेल्या भजन मंडळीचे गावकरी व मंदिर समितीतर्फे आदरातीथ्य करण्यात येते. दररोज सायंकाळच्या सुमारास गावातील आबालवृद्ध मंदिरात एकत्र येतात. त्यामुळे एकात्मतेचे दर्शन घडते. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. सात दिवस अखंडटाळ, भजन राहत असल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.याबाबत इतर गावांमध्ये शंकरपटाचे आयोजन केले जायचे. त्यानिमित्त पाहुणे मंडळी एकत्र येऊन वधू-वर पाहणी केली जात होती. अखंडटाळ हा आमच्या गावातील वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव आहे. यानिमित्त बाहेरगावची पाहुणे मंडळी, मुली, जावई व गावातील नोकरीवर असणारे युवक यानिमित्ताने गावात येतात. यानिमित्ताने वर्षाची किमान एकदातरी भेटीगाठी होतात. त्यामुळे स्नेहाचे संबंध कायम राहण्यास मदत होते. या उत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. ही परंपरा आमची नवीन पिढी पुढेही चालू ठेवले.-कैलास पारधी,सरपंच, मोहटोला

टॅग्स :Navratriनवरात्री