शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

बिनकामाचे इंजिनिअर तयार हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:36 IST

बारावी विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग खुला हाेताे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रमुख सहा शाखा आहेत. यामध्ये इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल्स, मेकॅनिकल, सिव्हील, ...

बारावी विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग खुला हाेताे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रमुख सहा शाखा आहेत. यामध्ये इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल्स, मेकॅनिकल, सिव्हील, काॅम्प्युटर सायन्स व केमिकल आदींचा समावेश आहे. या प्रमुख शाखांच्या अनेक उपशाखा आहेत. विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई ही प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. या परीक्षेत अधिकाधिक गुण मिळल्यास अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील चांगली शाखा मिळते. शासनातर्फे दरवर्षी जेईई परीक्षा घेतली जाते. जानेवारी व एप्रिल महिन्यात अशी दाेनदा ही परीक्षा हाेत असते. मात्र काेराेना महामारीच्या कारणामुळे वर्षभरात चार वेळा जेईई परीक्षा घेतली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रानंतर विज्ञान शाखेतील अधिकाधिक विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशाकडे वळतात. मात्र अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून शासकीय नाेकऱ्या व राेजगार उपलब्ध हाेत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला आहे.

बाॅक्स

तयारी करणारे विद्यार्थी संख्या ३३५०

दरवर्षी प्रवेश मिळणारे विद्यार्थी संख्या १५०

तीन वर्षात शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी ५००

काेट

गणित व भाैतिकशास्त्र विषय वगळून अभियांत्रिकी प्रवेशाला निर्णय देण्याचा निर्णय चुकीचा आहे. प्रवेश मिळूनही या क्षेत्रातील एबीसीडी माहित नसल्याने या शिक्षणाचा पाया कच्चा राहिल. अभियांत्रीकी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणेही कठीण जाईल. राज्यातील माेठ्या संख्येने असलेल्या अभियांत्रिकी काॅलेजला विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळावे. राजकीय क्षेत्रात असलेल्या संस्था प्रमुखांचे काॅलेज चालावे, याकरीता हा चुकीचा निर्णय घेतला जात आहे.

- वैभव धात्रक, गडचिराेली

काेट

अभियांत्रिकी शिक्षणात गणित व भाैतिकशास्त्र विषय आवश्यक आहे. इयत्ता अकरावी, बारावीला हे विषय नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश दिल्यास चार वर्षात अभियांत्रिकीच्या परीक्षा उत्तीर्ण हाेणे कठीण आहे. संबंधित विद्यार्थी पास झाला तरी गुणवत्ता राहणार नाही. परिणामी अभियांत्रिकीची पदवी घेऊनही असे विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही.

- ए.व्ही.एस. शर्मा, गडचिराेली

बाॅक्स

डीएड्, बीएड् काेर्ससारखी परीस्थिती

काही वर्षापूर्वी शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या डीएड व बीएड या अभ्यासक्रमाला महाराष्ट्रात प्रचंड मागणी व स्काेप हाेता. मात्र काॅलेजच्या संख्येनुसार डीएड व बीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बेराेजगार विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. परिणामी गेल्या १० वर्षात शिक्षकांच्या तेवढ्या जागा निर्माण झाल्या नाही. परिणामी बेराेजगारीने हे विद्यार्थी हैराण झाले. अशीच परिस्थिती आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची झाली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करूनही हाताला काम नाही, नाेकरी नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अभियांत्रीकीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी पुढे येत नाही. परिणामी जागा रिक्त राहून काही महाविद्यालय ओस पडत आहे.

गाेंडवानात एकच काॅलेज

गाेंडवाना विद्यापीठ गडचिराेली अंतर्गत चंद्रपूर येथे एकमेव शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय आहे. येथे सहा शाखा असून साडेतीनशेवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.