शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बिनकामाचे इंजिनिअर तयार हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:36 IST

बारावी विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग खुला हाेताे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रमुख सहा शाखा आहेत. यामध्ये इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल्स, मेकॅनिकल, सिव्हील, ...

बारावी विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग खुला हाेताे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रमुख सहा शाखा आहेत. यामध्ये इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल्स, मेकॅनिकल, सिव्हील, काॅम्प्युटर सायन्स व केमिकल आदींचा समावेश आहे. या प्रमुख शाखांच्या अनेक उपशाखा आहेत. विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई ही प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. या परीक्षेत अधिकाधिक गुण मिळल्यास अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील चांगली शाखा मिळते. शासनातर्फे दरवर्षी जेईई परीक्षा घेतली जाते. जानेवारी व एप्रिल महिन्यात अशी दाेनदा ही परीक्षा हाेत असते. मात्र काेराेना महामारीच्या कारणामुळे वर्षभरात चार वेळा जेईई परीक्षा घेतली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रानंतर विज्ञान शाखेतील अधिकाधिक विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशाकडे वळतात. मात्र अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून शासकीय नाेकऱ्या व राेजगार उपलब्ध हाेत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला आहे.

बाॅक्स

तयारी करणारे विद्यार्थी संख्या ३३५०

दरवर्षी प्रवेश मिळणारे विद्यार्थी संख्या १५०

तीन वर्षात शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी ५००

काेट

गणित व भाैतिकशास्त्र विषय वगळून अभियांत्रिकी प्रवेशाला निर्णय देण्याचा निर्णय चुकीचा आहे. प्रवेश मिळूनही या क्षेत्रातील एबीसीडी माहित नसल्याने या शिक्षणाचा पाया कच्चा राहिल. अभियांत्रीकी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणेही कठीण जाईल. राज्यातील माेठ्या संख्येने असलेल्या अभियांत्रिकी काॅलेजला विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळावे. राजकीय क्षेत्रात असलेल्या संस्था प्रमुखांचे काॅलेज चालावे, याकरीता हा चुकीचा निर्णय घेतला जात आहे.

- वैभव धात्रक, गडचिराेली

काेट

अभियांत्रिकी शिक्षणात गणित व भाैतिकशास्त्र विषय आवश्यक आहे. इयत्ता अकरावी, बारावीला हे विषय नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश दिल्यास चार वर्षात अभियांत्रिकीच्या परीक्षा उत्तीर्ण हाेणे कठीण आहे. संबंधित विद्यार्थी पास झाला तरी गुणवत्ता राहणार नाही. परिणामी अभियांत्रिकीची पदवी घेऊनही असे विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही.

- ए.व्ही.एस. शर्मा, गडचिराेली

बाॅक्स

डीएड्, बीएड् काेर्ससारखी परीस्थिती

काही वर्षापूर्वी शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या डीएड व बीएड या अभ्यासक्रमाला महाराष्ट्रात प्रचंड मागणी व स्काेप हाेता. मात्र काॅलेजच्या संख्येनुसार डीएड व बीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बेराेजगार विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. परिणामी गेल्या १० वर्षात शिक्षकांच्या तेवढ्या जागा निर्माण झाल्या नाही. परिणामी बेराेजगारीने हे विद्यार्थी हैराण झाले. अशीच परिस्थिती आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची झाली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करूनही हाताला काम नाही, नाेकरी नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अभियांत्रीकीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी पुढे येत नाही. परिणामी जागा रिक्त राहून काही महाविद्यालय ओस पडत आहे.

गाेंडवानात एकच काॅलेज

गाेंडवाना विद्यापीठ गडचिराेली अंतर्गत चंद्रपूर येथे एकमेव शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय आहे. येथे सहा शाखा असून साडेतीनशेवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.