शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

आत्मसमर्पित नक्षली जोडपी अडकली विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:53 IST

पोलिसांच्या पुढाकारानं ९७ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

गडचिरोली : सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे यात दोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचाही समावेश आहे. नक्षल चळवळीतून बाहेर आल्यानंतरच आमच्या जीवनाला खरी सुरूवात झाली असून चळवळीतील जीवनापेक्षा बाहेरचे जीवन कितीतरी चांगले आहे, अशी भावना त्यांनी या सोहळ्यानंतर व्यक्त केली. पोलीस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर, धर्मदाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त साईसेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त पुढाकारानं हा अनोखा सोहळा गडचिरोलीत पार पडला. अतिशय नियोजनबद्धरित्या आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार ही जोडपी विवाहबद्ध झाली. भुमकांनी (आदिवासी पुजारी) विधिवत हा समारंभ पार पाडला. भव्य अशा शामियान्यात पोलीस उपविभागनिहाय वेगवेगळे कप्पे तयार करून जोडप्यांना बसविण्यात आलं होतं. प्रत्येक कप्प्यात मोहाच्या झाडाच्या साक्षीनं पाच दिव्यांभोवती सात फेरे घेऊन आदिवासी भाषेत मंगलाष्टकं झाली. प्रत्येक मंगलाष्टकानंतर जोडप्यांवर अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. वऱ्हाड्यांच्या जेवणापासून तर सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी व सदस्य त्यासाठी झटताना दिसत होते. या सोहळ्यानंतर गडचिरोली शहराच्या मुख्य रस्त्यावरून ३० ट्रॅक्टरमधून नवदाम्पत्याची फेरवरात काढण्यात आली. 

यावेळी जिल्ह्याचे खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारीगण आणि जिल्हाभरातून आलेले वºहाडी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. पोलीस आणि आदिवासी समाजात जवळीक वाढवण्यासाठी त्यांना अधिकृत विवाहाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. या माध्यमातून नवविवाहित दाम्पत्यांना विविध योजनांचा लाभ मिळेल, असं या सोहळ्याचं आयोजन केल्याचं पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितलं.

'आतापर्यंत अंधारातच जगत होतो'या सामूहिक विवाहात नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण केलेले दीपक आणि छाया तसेच रैनू आणि रूची या पूर्वाश्रमीच्या नक्षलींनी विवाहबद्ध होऊन नवीन जीवनाला सुरूवात केली. नक्षल चळवळीतील जीवन आणि आताचे जीवन यात काय फरक आहे? असा प्रश्न त्यांना केला असता, आतापर्यंत आम्ही अंधारातच जगत होतो. आता खऱ्या अर्थानं जीवनाला सुरूवात झाली आहे. अल्पवयात बंदुकीचं आकर्षण असल्यानं नक्षल चळवळीकडे आकृष्ट झालो होतो. कुटुंबियांनी विरोध केला, पण नक्षल नेत्यांनी त्यांनाच धमकावलं. आता मात्र कोणताही त्रास नसून मोकळे वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीmarriageलग्नGadchiroliगडचिरोली