शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

आत्मसमर्पित नक्षली जोडपी अडकली विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:53 IST

पोलिसांच्या पुढाकारानं ९७ आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

गडचिरोली : सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विशेष म्हणजे यात दोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचाही समावेश आहे. नक्षल चळवळीतून बाहेर आल्यानंतरच आमच्या जीवनाला खरी सुरूवात झाली असून चळवळीतील जीवनापेक्षा बाहेरचे जीवन कितीतरी चांगले आहे, अशी भावना त्यांनी या सोहळ्यानंतर व्यक्त केली. पोलीस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर, धर्मदाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त साईसेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त पुढाकारानं हा अनोखा सोहळा गडचिरोलीत पार पडला. अतिशय नियोजनबद्धरित्या आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार ही जोडपी विवाहबद्ध झाली. भुमकांनी (आदिवासी पुजारी) विधिवत हा समारंभ पार पाडला. भव्य अशा शामियान्यात पोलीस उपविभागनिहाय वेगवेगळे कप्पे तयार करून जोडप्यांना बसविण्यात आलं होतं. प्रत्येक कप्प्यात मोहाच्या झाडाच्या साक्षीनं पाच दिव्यांभोवती सात फेरे घेऊन आदिवासी भाषेत मंगलाष्टकं झाली. प्रत्येक मंगलाष्टकानंतर जोडप्यांवर अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. वऱ्हाड्यांच्या जेवणापासून तर सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. मैत्री परिवार संस्थेचे पदाधिकारी व सदस्य त्यासाठी झटताना दिसत होते. या सोहळ्यानंतर गडचिरोली शहराच्या मुख्य रस्त्यावरून ३० ट्रॅक्टरमधून नवदाम्पत्याची फेरवरात काढण्यात आली. 

यावेळी जिल्ह्याचे खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारीगण आणि जिल्हाभरातून आलेले वºहाडी या सोहळ्याचे साक्षीदार ठरले. पोलीस आणि आदिवासी समाजात जवळीक वाढवण्यासाठी त्यांना अधिकृत विवाहाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. या माध्यमातून नवविवाहित दाम्पत्यांना विविध योजनांचा लाभ मिळेल, असं या सोहळ्याचं आयोजन केल्याचं पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितलं.

'आतापर्यंत अंधारातच जगत होतो'या सामूहिक विवाहात नक्षल चळवळीतून बाहेर येऊन आत्मसमर्पण केलेले दीपक आणि छाया तसेच रैनू आणि रूची या पूर्वाश्रमीच्या नक्षलींनी विवाहबद्ध होऊन नवीन जीवनाला सुरूवात केली. नक्षल चळवळीतील जीवन आणि आताचे जीवन यात काय फरक आहे? असा प्रश्न त्यांना केला असता, आतापर्यंत आम्ही अंधारातच जगत होतो. आता खऱ्या अर्थानं जीवनाला सुरूवात झाली आहे. अल्पवयात बंदुकीचं आकर्षण असल्यानं नक्षल चळवळीकडे आकृष्ट झालो होतो. कुटुंबियांनी विरोध केला, पण नक्षल नेत्यांनी त्यांनाच धमकावलं. आता मात्र कोणताही त्रास नसून मोकळे वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीmarriageलग्नGadchiroliगडचिरोली