दोन महिन्यांचे वेतन अडले
By Admin | Updated: June 8, 2014 23:53 IST2014-06-08T23:53:38+5:302014-06-08T23:53:38+5:30
शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे एप्रिल, मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या

दोन महिन्यांचे वेतन अडले
शालार्थ प्रणाली अडसर : शिक्षकांची सीईओकडे वेतन काढण्याची मागणी
गडचिरोली : शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे एप्रिल, मे या दोन महिन्यांचे वेतन अद्याप काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी तातडीने शिक्षकांचे वेतन काढण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांचे मागील दोन महिन्यापासूनचे वेतन काढण्यात न आल्याने शिक्षकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. शालार्थ वेतन प्रणालीमुळे जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन एप्रिल, मे या लग्न समारंभाच्या काळात अडल्याने अनेक शिक्षकांना पैशाची अडचण जाणवली. ऐन लग्न समारंभातील महिन्यामध्ये शिक्षकांचे दोन महिन्याचे वेतन अडल्याने शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाविरूध्द तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. सुट्याच्या दिवसामध्ये शिक्षक बाहेरगावी व लग्न समारंभात कुटुंबासह जातात. परंतु दोन महिन्याचे वेतन अडल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शालार्थ प्रणालीमुळे शिक्षकांचे दोन महिन्यांचे अडलेले वेतन त्वरित काढण्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निर्देश द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे. शासनाने १ तारखेला वेतन करण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे वेतन हे जिल्हा सहकारी बँकामधून होते. मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे कधीकधी वेतनाला विलंबही होतो. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना नेहमीच करावा लागतो.
(शहर प्रतिनिधी)