२० लाख भाविक पोहोचले

By Admin | Updated: July 21, 2015 02:29 IST2015-07-21T02:29:21+5:302015-07-21T02:29:21+5:30

गोदावरी नदीचा राज्यातील शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्यातून होतो. नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाल्यापासून गोदावरी

Two million people reached the spot | २० लाख भाविक पोहोचले

२० लाख भाविक पोहोचले

पुष्कर मेळावा : सिरोंचा तालुक्यातून तेलंगणात गर्दी वाढली
सिरोंचा : गोदावरी नदीचा राज्यातील शेवटचा प्रवास सिरोंचा तालुक्यातून होतो. नाशिक येथे कुंभमेळा सुरू झाल्यापासून गोदावरी नदीच्या काठावर तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात पुष्कर महोत्सव साजरा केला जात आहे. आतापर्यंत या पुष्कर मेळाव्यात मागील पाच दिवसांत २० लाख भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.
यात महाराष्ट्रातील हजारो भाविकांचा समावेश आहे. शनिवार, रविवारी सुटी आल्यामुळे तब्बल १० लाख भाविकांनी पुष्कर मेळाव्याला भेट देऊन गोदावरीत नदीत स्रान केले. हैद्राबाद शहरापासून ते संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र तसेच छत्तीसगडमधून मोठ्या संख्येने भाविक पुष्कर मेळाव्यात दाखल होत आहेत. तेलंगणा सरकारने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोलीस सुरक्षा बंदोबस्तासह संपूर्ण व्यवस्था केली. विशेष म्हणजे या पुष्कर मेळाव्यात भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय तेलंगणा सरकारने होऊ दिली नाही. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही हजारो भाविक सिरोंचा येथे येऊन तेथून नावेतून गोदावरी नदीत स्नान करीत आहेत.
गेल्या पाच दिवसात २० लाखांवर भाविकांनी कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या हद्दीतील या गोदावरी नदीच्या घाटावर पुष्कर मेळाव्यात कुठलीही व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. गडचिरोली पोलिसांचा बंदोबस्त वगळता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारची उदासीनता दिसून येत असल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी तेलंगणा सरकारचे कौतुक करून महाराष्ट्र राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या पुष्कर मेळाव्याला तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष मधुसुदन चारी, तेलंगणाचे महसूल मंत्री इटला राजेंदर, आरोग्यमंत्री व काँग्रेसचे माजी खा. लगड पाटी राजगोपाल यांच्यासह रोज दोन ते तीन मंत्री भेट देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

हंसराज अहीर यांनीही केली बासर येथे पूजा
४केंद्रीय रसायन व खत मंत्री हंसराज अहीर यांनी तेलंगणा राज्याच्या बासर येथे जाऊन पुष्कर मेळाव्यात महापूजा केली. अहीर यांनी सिरोंचाच्या गोदावरी घाटांकडे पूजेसाठी पाठ फिरवत तेलंगणा राज्याच्या बासर येथे जाऊन महापूजा केल्यामुळे या भागातील नागरिकांनी केंद्रीय मंत्र्यांना आपल्या जुन्या मतदार संघाचा आता विसर पडला आहे, अशी भावना बोलून दाखविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्रामही पुष्कर मेळाव्याकडे फिरकले नाही.

Web Title: Two million people reached the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.