शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

अपात्र घाटातून रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 1:08 AM

राखीव वनक्षेत्रात पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी शासनाने रेती व गौण खनिज खननावर बंदी घातली आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील बांडे नदीच्या आलदंडी घाटाचा लिलाव महसूल विभागाकडून केला जात नाही.

ठळक मुद्देशासनाचा महसूल बुडतोय : राखीव वनक्षेत्र असल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : राखीव वनक्षेत्रात पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी शासनाने रेती व गौण खनिज खननावर बंदी घातली आहे. यासाठी मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील बांडे नदीच्या आलदंडी घाटाचा लिलाव महसूल विभागाकडून केला जात नाही. परंतु या घाटावरून खुलेआम अवैधरित्या रेती तस्करी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. शिवाय पर्यावरणालाही हानी पोहोचत आहे.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या गट्टा आलदंडी नदी घाटावरून रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बांडे नदी राखीव वनक्षेत्रात येत असल्याने या नदीवरील आलदंडी रेतीघाटाचा लिलाव करण्यास मागील पाच वर्षांपासून महसूल विभागाने प्रतिबंध घातले. परंतु प्रतिबंध घालूनही काहीच उपयोग दिसून येत नाही. या घाटावरून अवैधरित्या रेती तस्करी दिवसागणिक वाढत आहे. यंदा रेतीघाटांच्या लिलावासाठी महसूल विभागामार्फत जाहिरात देण्यात आली. परंतु अद्यापही प्रक्रिया पार पडली नाही.तालुक्यात आलदंडी घाट महत्त्वपूर्ण घाट आहे. या घाटावरून दररोज अनेक वाहने रेती भरून नेली जातात. तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी व कंत्राटदारांची बांधकामे सुरू आहेत. या कामांवर येथील रेतीचा वापर सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध रेती तस्करी करणाऱ्या लोकांचे फावले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शासन उद्देशाला हरताळबांडे नदी राखीव वनक्षेत्रात येत असल्याने या नदीच्या आलदंडी घाटावर वनविभागाकडून सीमारेषा आखण्यात आली. राखीव वनक्षेत्रातील रेती व गौण उपजांची तस्करी होऊ नये व पर्यावरणाला हानी पोहोचू नये, हा उद्देश या मागील आहे. उद्देश चांगला असला तरी या उद्देशाला रेती तस्करांकडून हरताळ फासल्या जात आहे. अवैध रेती तस्करी रोखण्यात महसूल व वन विभागाला अपयश येत असेल तर येथील आलदंडी घाटाचा लिलाव करून दरवर्षी बुडणारा महसूल वाचवावा, अशी प्रतिक्रिया जनसामान्यात उमटत आहे.

टॅग्स :sandवाळू