आजपासून कृषी व पशू संवर्धन महिना पाळणार
By Admin | Updated: June 9, 2014 23:38 IST2014-06-09T23:38:01+5:302014-06-09T23:38:01+5:30
जिल्ह्यातील शेतकर्यांना व पशु पालकांना कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १0 जून ते १0 जुलै या कालावधीत २५0 मेळावे

आजपासून कृषी व पशू संवर्धन महिना पाळणार
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकर्यांना व पशु पालकांना कृषी व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १0 जून ते १0 जुलै या कालावधीत २५0 मेळावे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील पशुधनाच्या संख्येत वाढ करणे, उपलब्ध पशु धनाच्या आरोग्याची काळजी घेणे, जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ करणे, पशु संवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांकडे पोहोचविण्यासोबतच बेरोजगारांना शेळीपालन, वराह पालन, कुकुट पालन, गोपालन या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण माहिती देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागामार्फत १५0 मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या मेळाव्यात जनावरांचे आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार असून जनावरांची तपासणी करण्यासोबतच विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांची माहितीही दिली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद कृषी विभाग, राज्य शासनाचा कृषी विभाग व आत्मा प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देणे, बांधावर खत योजना, o्रीपध्दतीची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकर्यांना फायदा करण्यासाठी माहिती देणे, या कामांसोबत बियाणांवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणे, विविध खतांचा शास्त्रोक्त पध्दतीने वापर करणे, खरीप हंगामाचे नियोजन, जिल्ह्यातील वितरित केलेल्या आधुनिक यंत्राचे प्रात्याक्षिक करून शेतकर्यांना प्रशिक्षीत करणे, मॅट नर्सरी, o्री पध्दतीची भाताची लागवड, सोयाबीन लागवड, कापूस लागवड तसेच मशीनद्वारे सोयाबीन, कापूस लागवड करून २0 ते ३0 टक्के उत्पादनात वाढ करणे, हळदीची लागवड, पावसाळी मका, भाजीपाल्यासोबत इतर पिकाची माहिती देणे, औषधी फवारणी या विषयी शेतकर्यांमध्ये माहिती दिली जाणार आहे. कृषी मेळाव्याच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले जाणार आहेत. औषधोपचार, दुग्धपालन, बकरी, शेळी, मेंढी, कुक्कुट पालन याविषयीही जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाचे दीडशे व पशु संवर्धन विभागाकडून दीडशे मेळावे १0 जून ते १0 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत. शेतकर्यांनी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समितीचे पशुधन विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती गण्यारपवार यांनी केले आहे.
जि.प.मार्फत राबविण्यात येणार्या या उपक्रमासाठी कृषी व पशु संवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. शिरीष रामटेके, कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरातील कृषी व पशु संवर्धन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. १0 जून ला गडचिरोली तालुक्यातील पारडी येथे या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकार्यांच्या हस्ते होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)