शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

उसेगाव परिसरात वाघाचे तीन बळी, ग्रामीण दहशतीत; उपाययोजना करण्याचे खासदारांचे निर्देष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 13:05 IST

या वाघाचा बंदोबस्त करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना जंगलात जाणे अपरिहार्य

देसाईगंज (गडचिरोली) : तालुक्यातील उसेगाव परिसरात वावरणाऱ्या वाघाने गेल्यावर्षी एकाचा बळी घेतल्यानंतर यावर्षी अवघ्या १८ दिवसात दोन इसमांच्या नरडीचा घोट घेतला. त्यामुळे नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत. आता तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होत असल्याने पुढे हे संकट आणखी वाढणार आहे. त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

वन विभागाच्या विश्रामगृहात बुधवारी खासदार अशोक नेते यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी कऱ्हांडे, दिलीप कौशिक, विजय धांडे यांच्यासह शिवराजपूर उसेगाव वन समितीचे अध्यक्ष प्रमोद झिलपे, सुनील पारधी, योगेश नाकतोडे, वसंत दोनाडकर व इतर ग्रामवासीय उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे यांनी मृत अजित नाकाडे यांच्या कुटुंबीयांना व खासदार नेते यांनी मृत मधुकर मेश्राम यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५००० रुपये आर्थिक मदत दिली.

सात वाघांचे अस्तित्व, काळजी घ्या

यावेळी उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले की, उसेगाव जंगल परिसरात १८ दिवसात हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. हा वाघ बाहेरून आलेला आहे. सद्यस्थितीत या परिसरात एकूण ७ वाघ अस्तित्वात आहेत. वन्यप्राण्यांचा वावर सतत वाढत असल्याने संबंधित ग्रामपंचायती, वनहक्क समित्यांच्या जंगल परिसरात नागरिकांनी जाऊ नये. काहीजण बेसावधपणे जात असल्याने अशा अप्रिय घटना घडत आहेत, असे त्यांनी सांगितले.

अन् त्याची मैत्रिण थोडक्याच बचावली

वाघाच्या हल्ल्यात या भागात १४ एप्रिलला कुरुडच्या मधुकर मेश्राम याचा जीव गेला. मंगळवारी चोप येथील २४ वर्षीय युवक अजित सोमा नाकाडे यालाही जीव गमवावा लागला. अजित आपल्या मैत्रिणीसोबत उसेगाव जंगल शिवारात गेला होता. यावेळी त्याच्या मैत्रिणीवरही वाघाने हल्ला केला होता, मात्र ती थोडक्यात बचावली.

वाघापासून बचावासाठी उपाययोजना

या बैठकीला वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देताना खा. नेते म्हणाले, बऱ्याच शेतकऱ्याचे शेत, जंगल परिसरालगत असल्याने त्यांना पिकाचे पाणी देण्याकरता वेळोवेळी जावे लागते. लोडशेडिंगमुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा रात्री ११ वाजता सुरू होतो. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेवून शेतात जावे लागते. तेंदुपत्ता संकलनावर बऱ्याच लोकांचे जीवनमान अवलंबून असल्याने मजुरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

या वाघाने देसाईगंजलगत असलेल्या इंदोरा येथील एका व्यक्तीला मोहफुल संकलन करीत असताना ठार केले. हानी टाळण्यासाठी वनविभागाने त्याला तत्काळ जेरबंद करावे, रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली झुडुपे नष्ट करावी. वन्यजिवांचा वावार असलेल्या परिसरातील हद्दीला सोलर कुंपण लावून रहदारीच्या मार्गावर वन्यजीव येणार नाही याची दक्षता घ्यावी. गावपातळीवरील वन समित्यांद्वारे चौकीदारांंची संख्या वाढवून जंगल परिसरात नागरिक जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :forest departmentवनविभागgadchiroli-acगडचिरोलीTigerवाघDeathमृत्यूAshok Neteअशोक नेते