शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सिझेरियन प्रसूतीनंतर तिसऱ्या मातेचाही मृत्यू, जिल्ह्यात आठ दिवसांत तिघींनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 10:57 IST

कधी थांबणार आक्रोश : आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

गडचिरोली : राज्यात शासकीय रुग्णालयांत मृत्यूसत्र सुरू असताना जिल्ह्यातही याहून वेगळी स्थिती नाही. सिझेरियन प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना प्रकृती गंभीर झालेल्या तिसऱ्या महिलेनेही ३ ऑक्टोबरला रात्री प्राण सोडले. आठवड्यात तीन माता मृत्यूने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) असे मृत मातेचे नाव असून तिची मुलगी सुखरूप आहे. नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात रजनी प्रकाश शेडमाके (२३, रा. भानसी, ता. सावली, जि. चंद्रपूर), उज्ज्वला नरेश बुरे (२२, रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी ह. मु. इंदिरानगर, गडचिरोली) व वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) या तिघी प्रसववेदना जाणवू लागल्याने शहरातील महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली.

प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविले, परंतु संध्याकाळी रजनी शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला नागपूरला हलविण्याचा निर्णय घेतला, पण उज्ज्वलाचा वाटेतच मृत्यू झाला. नागपूर येथे उपचार सुरू असताना वैशालीचा ३ ऑक्टोबरच्या रात्री मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाबद्दल रोष वाढत आहे.

तीन चिमुरडे मातृप्रेमाला पोरकी

दरम्यान, तिन्ही मातांची मुले सुखरूप आहेत, परंतु जन्मत:च आई जग सोडून गेल्याने या इवल्याशा जीवांवर मातृप्रेमाला पोरके होण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. त्यामुळे नातेवाईक शोकमग्न असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अद्याप कोणावरही कारवाई नाही

दरम्यान, एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे अपयश समोर आले आहे. मातामृत्यूनंतर कारणमीमांसा शोधण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून डेथ ऑडिट केले जाणार आहे, परंतु अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सगळा कारभार आलबेल आहे, तर मृत्यूसत्र कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिन्ही महिलांवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया केली, त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा झाला, असे म्हणता येणार नाही.अनेकदा रुग्णाची प्रतिकारशक्ती देखील महत्त्वाची असते. या तिन्ही मातांची प्रकृती अचानक खालावली, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत.

- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्यpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलGadchiroliगडचिरोली