शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

सिझेरियन प्रसूतीनंतर तिसऱ्या मातेचाही मृत्यू, जिल्ह्यात आठ दिवसांत तिघींनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 10:57 IST

कधी थांबणार आक्रोश : आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

गडचिरोली : राज्यात शासकीय रुग्णालयांत मृत्यूसत्र सुरू असताना जिल्ह्यातही याहून वेगळी स्थिती नाही. सिझेरियन प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना प्रकृती गंभीर झालेल्या तिसऱ्या महिलेनेही ३ ऑक्टोबरला रात्री प्राण सोडले. आठवड्यात तीन माता मृत्यूने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) असे मृत मातेचे नाव असून तिची मुलगी सुखरूप आहे. नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात रजनी प्रकाश शेडमाके (२३, रा. भानसी, ता. सावली, जि. चंद्रपूर), उज्ज्वला नरेश बुरे (२२, रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी ह. मु. इंदिरानगर, गडचिरोली) व वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) या तिघी प्रसववेदना जाणवू लागल्याने शहरातील महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली.

प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविले, परंतु संध्याकाळी रजनी शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला नागपूरला हलविण्याचा निर्णय घेतला, पण उज्ज्वलाचा वाटेतच मृत्यू झाला. नागपूर येथे उपचार सुरू असताना वैशालीचा ३ ऑक्टोबरच्या रात्री मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाबद्दल रोष वाढत आहे.

तीन चिमुरडे मातृप्रेमाला पोरकी

दरम्यान, तिन्ही मातांची मुले सुखरूप आहेत, परंतु जन्मत:च आई जग सोडून गेल्याने या इवल्याशा जीवांवर मातृप्रेमाला पोरके होण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. त्यामुळे नातेवाईक शोकमग्न असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अद्याप कोणावरही कारवाई नाही

दरम्यान, एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे अपयश समोर आले आहे. मातामृत्यूनंतर कारणमीमांसा शोधण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून डेथ ऑडिट केले जाणार आहे, परंतु अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सगळा कारभार आलबेल आहे, तर मृत्यूसत्र कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिन्ही महिलांवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया केली, त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा झाला, असे म्हणता येणार नाही.अनेकदा रुग्णाची प्रतिकारशक्ती देखील महत्त्वाची असते. या तिन्ही मातांची प्रकृती अचानक खालावली, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत.

- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्यpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलGadchiroliगडचिरोली