बर्ड फ्लूची लागण व भीती नाही, मात्र स्वच्छता व काळजी घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:49+5:302021-01-13T05:34:49+5:30
गडचिराेली : परभणीसह महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनही सतर्क झाले असून ...

बर्ड फ्लूची लागण व भीती नाही, मात्र स्वच्छता व काळजी घेणे आवश्यक
गडचिराेली : परभणीसह महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनही सतर्क झाले असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत कुठेही बर्ड फ्लू आढळला नाही. मात्र पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या जिल्हाभरात १७ रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या चमू बर्ड फ्लूसंदर्भात अतिशय दक्ष आहेत. तीन महिन्यापूर्वी झालेल्या पशुगणनेनुसार गडचिराेली जिल्ह्यात गावठी व घरगुती देशी बर्ड मिळून जवळपास १० लाख १६५ काेंबड्या आहेत. शहरी व ग्रामीण भागातील पशुपालक विदेशी काेंबड्यांचे पालन करीत नाही. मात्र पाेल्ट्री फार्मधारक विदेशी काेंबड्यांचे पालन करून व्यवसाय करतात. जिल्ह्यात कुठेही मृत पक्षी आढळल्यास संबंधितांनी त्याची याेग्य विल्हेवाट लावावी. स्वच्छता बाळगून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले. पाेल्ट्री फार्मजवळ झाडे नसावीत. कारण परजिल्ह्यातून व राज्यातून विदेशी व इतर प्रकारच्या पक्षी तेथे येऊन देशी काेंबड्यांमध्ये मिसळतात. परिणामी, अशावेळी व्हायरल इन्फेक्शन हाेण्याची शक्यता असते. गडचिराेली जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळला नसला तरी पशुपालक, पाेल्ट्री फार्मधारक व विभाग सतर्क झाला आहे.
बाॅक्स
पशुसंवर्धन विभागाकडून घेतला जात आहे आढावा
गडचिराेली जिल्ह्यात काेंबड्या, कावळे, पाेपट आदीसह विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या माेठी आहे. वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन निर्माण हाेऊन सदर पक्षी अचानक मृत्यूमुखी पडत असतात. बर्ड फ्लूसारखा धाेका जिल्ह्यात निर्माण हाेऊ नये, या उद्देशाने जि.प. पशुसंवर्धन विभागातर्फे परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पशुपालक पाेल्ट्री फार्मधारकांना सतर्क करण्यात आले आहे.
मृत पक्षी आढळल्यास तात्काळ कळवा
बर्ड फ्लूची जिल्ह्यात बाधा नसली तरी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. व्हायरल विषाणूमुळे काेंबड्या मृत्यूमुखी पडतात. पशुपालकांनी लसी व औषधाेपचार करून घ्यावा. जिल्ह्यात कुठेही मृत पक्षी आढळल्यास नागरिकांनी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
काेट
गडचिराेली जिल्ह्यात कुठेही आतापर्यंत बर्ड फ्लू आढळला नाही तसेच कुठेही शिरकाव झाला नाही. असे असले तरी आमच्या विभागात संपूर्ण काळजी घेतली जात असून, जिल्हाभरात १७ रॅपिड रिॲक्शन टीम तयार केल्या आहेत. पशुपालक व पाेल्ट्री फार्मधारकांनी स्वच्छता बाळगून प्रतिबंधात्मक उपाययाेजना कराव्यात.
- डाॅ. सुरेश कुमरे, पशुसंवर्धन अधिकारी