शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पीक विम्याची प्रतीक्षा संपली : ५.३८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:43 IST

वर्षभराची प्रतीक्षा संपली : पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर केंद्र शासनाकडून पीक विमा मंजूर होऊन राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर सोमवार, ११ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ कोटी ३८ लाख रुपये विमा रक्कम जमा करण्यात आली. सकाळी ११ वाजल्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा फोन मेसेजच्या ट्यूनने खणखणला.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा योजना होती. या योजनेंतर्गत जवळपास ९१ हजार विमा प्रस्ताव जिल्ह्यातून सादर करण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला. तसेच पिकांवर रोगराईचे संकट आले नाही. मात्र, अवकाळी पाऊस व पुरामुळे पिकांची नासाडी झाली. पिकांची काढणी झाली असतानाच परतीचा अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला गेला.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला व नुकसान झाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंद केली, अशा शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झाले; परंतु विमा रक्कम प्राप्त झाली नव्हती. उशिरा का होईना ही रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे.

६,३५७ शेतकऱ्यांनी विम्यासाठी केला दावापीक नुकसानानंतर लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ३५७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अॅपवर व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात कंपनीकडे दावा केला होता. परंतु, २ हजार ५०० वर शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले. पीक नुकसानानंतर ७२ तासांच्या आत नुकसानाची नोंदणी मोबाइल अॅपवर करावी लागते. त्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करतात. 

कधी होतो विमा मंजूर ?पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व रोग यामुळे उत्पादनात येणारी घट, यासाठी मदत मिळते. 

१४ ऑगस्टपर्यंत पीक विमा नोंदवण्याची मुदत

  • यंदाच्या खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवण्याची मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्टपर्यंत आहे तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अवधी आहे.
  • यंदा सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून पिकांना सुरक्षा कवच द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

३,६५० यंदा जिल्ह्यात पीक विमा नोंदणीला अल्प प्रतिसादशेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप पिकांच्या विम्याचा लाभमिळालेला आहे. त्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम वळती करण्यात आलेली आहे. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrop Insuranceपीक विमा