शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
3
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
4
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
6
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
7
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
8
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
9
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
11
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
12
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
13
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
14
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
15
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
16
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
17
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
18
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
19
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
20
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची प्रतीक्षा संपली : ५.३८ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:43 IST

वर्षभराची प्रतीक्षा संपली : पोळा सणापूर्वीच रक्कम आल्याने दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर केंद्र शासनाकडून पीक विमा मंजूर होऊन राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर सोमवार, ११ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ कोटी ३८ लाख रुपये विमा रक्कम जमा करण्यात आली. सकाळी ११ वाजल्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा फोन मेसेजच्या ट्यूनने खणखणला.

मागील वर्षीच्या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा योजना होती. या योजनेंतर्गत जवळपास ९१ हजार विमा प्रस्ताव जिल्ह्यातून सादर करण्यात आले होते. दरम्यान, मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडला. तसेच पिकांवर रोगराईचे संकट आले नाही. मात्र, अवकाळी पाऊस व पुरामुळे पिकांची नासाडी झाली. पिकांची काढणी झाली असतानाच परतीचा अवकाळी पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला गेला.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला व नुकसान झाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंद केली, अशा शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झाले; परंतु विमा रक्कम प्राप्त झाली नव्हती. उशिरा का होईना ही रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. पोळा सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे.

६,३५७ शेतकऱ्यांनी विम्यासाठी केला दावापीक नुकसानानंतर लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ३५७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अॅपवर व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात कंपनीकडे दावा केला होता. परंतु, २ हजार ५०० वर शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले. पीक नुकसानानंतर ७२ तासांच्या आत नुकसानाची नोंदणी मोबाइल अॅपवर करावी लागते. त्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करतात. 

कधी होतो विमा मंजूर ?पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड व रोग यामुळे उत्पादनात येणारी घट, यासाठी मदत मिळते. 

१४ ऑगस्टपर्यंत पीक विमा नोंदवण्याची मुदत

  • यंदाच्या खरीप हंगामात पिकांचा विमा उतरवण्याची मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्टपर्यंत आहे तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अवधी आहे.
  • यंदा सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून पिकांना सुरक्षा कवच द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

३,६५० यंदा जिल्ह्यात पीक विमा नोंदणीला अल्प प्रतिसादशेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप पिकांच्या विम्याचा लाभमिळालेला आहे. त्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम वळती करण्यात आलेली आहे. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrop Insuranceपीक विमा