शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 12:06 PM

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना अजूनही जुन्या कालबाह्य शासन निर्णयानुसार आणि तत्कालीन दराप्रमाणे मदत वाटपाचे नियोजन केले जात आहे. परिणामी ही मदत तुटपुंजी ठरत आहे.

ठळक मुद्देमदत वाटपाचा जीआर ‘अपडेट’ केलाच नाही

मनोज ताजने

गडचिरोली : नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून संयुक्तपणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ८ एप्रिल २०१५ च्या पत्रानुसार २०१५ ते २०२० या कालावधीसाठी नैसर्गिक आपत्तीत मदत देण्याबाबतचे निकष आणि दर निश्चित करण्यात आले होते; पण २०२० नंतरच्या कालावधीसाठी तो शासन निर्णय ‘अपडेट’ केलाच नसल्यामुळे आजही सात वर्षांपूर्वी ठरविलेल्या जुन्याच निकषानुसार मदत वाटप केली जात आहे.

गेल्या सात वर्षात महागाई बरीच वाढलेली आहे. विशेषत: डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. तरीही नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना अजूनही जुन्या कालबाह्य शासन निर्णयानुसार आणि तत्कालीन दराप्रमाणे मदत वाटपाचे नियोजन केले जात आहे. परिणामी ही मदत तुटपुंजी ठरत आहे.

राज्याच्या महसूल व वनविभागाने केंद्र शासनाच्या निकषावर आधारित नैसर्गिक आपत्तीत बाधित होणाऱ्या व्यक्तींना मदत देण्यासाठी १३ मे २०१५ रोजी शासन निर्णय जारी केला होता. तो २०१५ ते २०२० या कालावधीपुरताच मर्यादित होता. त्यामुळे नंतर नवीन शासन निर्णय जारी करून मदतीच्या रकमेत वाढ करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नसल्यामुळे दोन वर्षांपासून त्या कालबाह्य जीआरच्या आधारावर मदत वाटप केली जात आहे. यात जीवित हाणी, घरांची हाणी, शेतीची हानी या सर्वच बाबतीत मदतीत वाढ करणे गरजेचे झाले आहे.

मृतासाठी चार लाख, अपंगत्वासाठी ५९ हजार

सद्य:स्थितीत मदत वाटपासाठी वापरल्या जाणाऱ्या २०१५ च्या जीआरनुसार नैसर्गिक आपत्तीत किंवा मदतकार्य करताना मृत्यू ओढवल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला अवघी ४ लाख रुपयांची मदत दिली जाते. याशिवाय ४० ते ६० टक्केपर्यंत अपंगत्व आल्यास जेमतेम ५९ हजार रुपये आणि ६० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आले असल्यास २ लाखांची मदत दिली जाते.

घर पाण्यात बुडाले, २ हजार घ्या

सध्या अतिवृष्टी आणि धरणांमुळे विसर्गामुळे नद्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरत आहे. त्यात अनेकांच्या घरातील धान्य, वस्तू खराब झाल्या आहेत. काही घरांची अंशत: हानी तर काहींचे घर पूर्णत: कोसळले आहे. यात हजारो, लाखोंचे नुकसान झाले असू शकते; पण शासनाच्या निकषानुसार दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात असेल तर त्या कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी १८०० रुपये आणि भांडी, वस्तूंच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब अवघी २ हजार रुपयांची मदत दिली जाते.

टॅग्स :floodपूरRainपाऊसGadchiroliगडचिरोलीGovernmentसरकार