शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना तेलंगणाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:52 AM

धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.

ठळक मुद्देएकही खरेदी केंद्र नाही छोट्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या काही वर्षांपासून कापसाचा पेरा वाढत आहे. यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धानाचा पेरा होतो. परंतू अलिकडच्या काही वर्षात धानाचा पेरा कमी होऊन कापसाची लागवडही केली जात आहे. तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या गडचिरोलीच्या सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यात तेलगू शेतकऱ्यांच्या मदतीने कापूस लागवडीचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. पण धानाप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या जिनिंग फॅक्टरीकडूनही शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. परंतू शासकीय दराएवढा दर कोणीही देत नाही. त्यामुळे काही मोठे शेतकरी तेलंगणा राज्यात जाऊन तेथील खरेदी केंद्रावर किंवा जिनिंगला आपला कापूस विकतात. खासगी व्यापाऱ्यांपेक्षा तिथे जास्त दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.वास्तविक १४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कापसासाठी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाकडून चार तालुक्यात प्रत्येकी एक खरेदी केंद्र देणे आवश्यक होते. परंतू लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला नाही.एकही केंद्र नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंड सहन करीत तेलंगणा गाठावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी