शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शिक्षकांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:02 AM

राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

ठळक मुद्दे४० शाळांमधील चित्र : भामरागड, एटापल्ली, सिरोंचात पदे रिक्त

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विशेष करून भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यात जवळपास ४० शाळांमध्ये सद्य:स्थितीत एकच शिक्षक कार्यरत असल्याची माहिती आहे. दुर्गम भागातील शिक्षणाचा हा खेळखंडोबा बंद करण्याची मागणी होत आहे.एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत सोहगाव, मेंढरी, गुडराम, गुंडाम, पुन्नूर, कोठी, देवदा, मवेली, पुसुमपल्ली, येडसगोंदी, नेंडेर या जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची एक ते दोन पदे रिक्त आहे. मोहंदी, वाळवी, बेसेवाडा, आलेंगा, सूरजागड, पुरसलगोंदी, गोडेली, मेंढरी, तोडगट्टा, पिपली बुर्गी, कचलेर, कुकेली, कोरनार, मोहुर्ली, कुदरी, हेटळकसा, वेलमागड, कुंडूम, जवेली, उईकेटोला, वांगेतुरी, रेगाटोला, जारावंडी, गट्टा, गिलगुड्डा, झारेवाडा, गोरगट्टा, येरवळवी, मोहंदी, वाळवी, बेसेवाडा, कोईनवशी, मुरेवाडा, नैताला, हाचबोडी, रेकलमेटा, मदाकुई, पुस्कोटी, रेकाभटाळ, नैनवाडी, जाजावडी, गट्टागुड्डा आदी शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांचे पद रिक्त आहे.एटापल्ली तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा आहेत. चार वर्ग असलेल्या शाळांमध्येच शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. उच्च प्राथमिक शाळांचीही परिस्थिती शिक्षकांच्या बाबतीत अशीच आहे.आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची जवळपास ४०, प्राथमिक शिक्षकांच्या २०० वर जागा रिक्त आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचीही १५ वर पदे रिक्त आहेत. अहेरी उपविभागातील अनेक शाळा दुर्गम, अतिदुर्गम व अवघड क्षेत्रात आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या आॅनलाईन बदली प्रक्रियेदरम्यान शहरी भागातील शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील शाळांबाबतचा प्रस्ताव अर्जात नमूद केला नाही. त्यामुळे ही स्थिती आहे.अनेक शिक्षक वैद्यकीय रजेवर, काही शिक्षक रूजू होईनाजि.प. शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील जवळपास ४०० शिक्षक विस्तापित झाले. सदर बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याचे कारण देत ५७ शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अवघड क्षेत्रात बदली झालेले शिक्षक संबंधित शाळेत रूजू झाले. मात्र त्यानंतर जवळपास ५० शिक्षक वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे. बदली होऊनही दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये रूजू झाले नाही. त्यामुळे अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, मुलचेरा या पाच तालुक्यात शिक्षकांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांनी इतर शाळांमधील शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात बदली करून यावर तोडगा काढला आहे.शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे. आॅनलाईन बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षक गेले नाही. भामरागड तालुक्यातील १४२ शिक्षकांची शहरी भागात बदली झाली. तर या तालुक्यात नव्याने ७० शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यामुळे या तालुक्यात शिक्षकांच्या निम्म्या जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी तीन ते चार व दोन शिक्षक आहेत, अशा ठिकाणच्या शाळांमधील शिक्षकांची दुर्गम शाळांमध्ये तात्परत्या स्वरूपात बदली करण्याचे आदेश बीओंना यापूर्वीच देण्यात आले होते.- पी.एच.उरकुडे, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.गडचिरोली

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा