शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

गडचिरोली : गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. गतवर्षी प्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी या परीक्षेचा निकाल फारच कमी लागल्याने यंदा पात्र होण्यासाठी गुणांची अट शिथील करण्यात आली आहे.गतवर्षी राज्यशासनाने राज्यभरातील सर्व भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या परीक्षेचा नियोजित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो डीएड्, बीएड्धारक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सदर परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र गतवर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शासनाने शिक्षक भरती न करताच पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांना पात्रता परीक्षेच्या अटीमध्ये शिथीलता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची संख्या यंदा वाढणार आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांनाही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० गुणांची तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ गुणांची अट शिथील करण्यात आली आहे. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार वर्ग १ ली ते ५ वी, वर्ग ६ वी ते ८ वीला अध्यापन करणाऱ्या इच्छुक शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. सदर शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात काही तालुक्यात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ जिल्हास्तरावरच टीईटी परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. यंदा पदवीच्या अंतिम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. ‘आॅफलाईन हार्ड कॉपी’ स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुकानिहाय अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत असल्याने तालुकास्तरावरील ग्रामीण तसेच दुर्गम उमेदवारांना सोयीचे होणार आहे. तालुकास्तरावर २० आॅक्टोबरपर्यंत टीईटी परीक्षेचे अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरावरून ३० आॅक्टोबरपर्यंत टीईटी परीक्षेचे सर्व उमेदवारांचे अर्ज शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा दोन गटात घेतली जाणार आहे. पहिला पेपर हा बहुपर्यायी १५० गुणांचा राहणार आहे. यामध्ये बाल मानसशास्त्र अध्यापनासाठी ३० गुण, भाषाविषय १ आणि २ साठी देखील ३० गुण, गणित ३० गुण, परिसर अभ्यासासाठी ३० गुण ठेवण्यात आले आहे. दुसरा पेपर हा उच्च प्राथमिकसाठी १५० गुणांचा राहणार आहे. यात भाषा १, २, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित, सामाजिकशास्त्र आदी विषय राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)