शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले

By admin | Updated: October 5, 2014 23:04 IST

गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

गडचिरोली : गतवर्षी १५ डिसेंबर २०१३ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्याचा कालावधीने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील पात्र भावी शिक्षकांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. गतवर्षी प्रमाणे यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचे पडघम वाजले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी या परीक्षेचा निकाल फारच कमी लागल्याने यंदा पात्र होण्यासाठी गुणांची अट शिथील करण्यात आली आहे.गतवर्षी राज्यशासनाने राज्यभरातील सर्व भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या परीक्षेचा नियोजित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो डीएड्, बीएड्धारक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सदर परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र गतवर्षीच्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र ठरलेल्या भावी शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शासनाने शिक्षक भरती न करताच पुन्हा यंदाही शिक्षक पात्रता परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यंदा प्राथमिक शिक्षकांना पात्रता परीक्षेच्या अटीमध्ये शिथीलता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची संख्या यंदा वाढणार आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रूजू झालेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या कार्यरत शिक्षकांनाही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या परीक्षेत खुल्या उमेदवारांना ५० गुणांची तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ गुणांची अट शिथील करण्यात आली आहे. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार वर्ग १ ली ते ५ वी, वर्ग ६ वी ते ८ वीला अध्यापन करणाऱ्या इच्छुक शिक्षण सेवक उमेदवाराला शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. सदर शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात काही तालुक्यात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ जिल्हास्तरावरच टीईटी परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. यंदा पदवीच्या अंतिम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या परीक्षेसाठी २७ सप्टेंबरपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. ‘आॅफलाईन हार्ड कॉपी’ स्वरूपात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुकानिहाय अर्ज संकलन केंद्र सुरू करण्यात येत असल्याने तालुकास्तरावरील ग्रामीण तसेच दुर्गम उमेदवारांना सोयीचे होणार आहे. तालुकास्तरावर २० आॅक्टोबरपर्यंत टीईटी परीक्षेचे अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरावरून ३० आॅक्टोबरपर्यंत टीईटी परीक्षेचे सर्व उमेदवारांचे अर्ज शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा दोन गटात घेतली जाणार आहे. पहिला पेपर हा बहुपर्यायी १५० गुणांचा राहणार आहे. यामध्ये बाल मानसशास्त्र अध्यापनासाठी ३० गुण, भाषाविषय १ आणि २ साठी देखील ३० गुण, गणित ३० गुण, परिसर अभ्यासासाठी ३० गुण ठेवण्यात आले आहे. दुसरा पेपर हा उच्च प्राथमिकसाठी १५० गुणांचा राहणार आहे. यात भाषा १, २, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित, सामाजिकशास्त्र आदी विषय राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)