शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

काँग्रेसच्या तिकिटासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:49 IST

लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनेत्यांना लागले लोकसभेचे वेध : वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वावर ठरणार उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी आता जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू होताच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षात तिकिटासाठी कोणतीही स्पर्धा नसली तरी काँग्रेसमध्ये मात्र रस्सीखेच सुरू झाली आहे. यावेळी आपल्यासाठी वातावरण अनुकूल राहील असा विचार करून काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होऊन पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचलेले भाजपचे खासदार अशोक नेते यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाच्या बहुतांश भागात जनसंपर्क ठेवून आपली पकड घट्ट केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा तीन जिल्ह्यात पसरलेल्या या मतदार संघाचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र पाहता सर्व भागात जनसंपर्क ठेवणे एक आव्हान असले तरी नेते हे आव्हान पेलण्यात बºयाच प्रमाणात यशस्वी झाले. त्यामुळेच आज भाजपमध्ये त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय अजूनतरी समोर आलेला नाही. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावाचीही अधूनमधून चर्चा सुरू असते. पण विजयाच्या निकषावर ते कितपत खरे उतरतील याबाबत भाजपकडूनच शंका उपस्थित केली जात असल्याने त्यांच्या नावाची चर्चा निव्वळ वावड्या ठरत आहे.दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र दिवसागणिक चुरस वाढत आहे. गेल्यावेळी मोदी लाट होती, पण यावेळी मात्र सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाची संधी असल्याचे गृहित धरून इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यात प्रामुख्याने माजी आमदार तथा काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान आणि युवा नेते म्हणून डॉ.नितीन कोडवते यांचे नाव समोर केले जात आहे. परंतू उमेदवार निवडताना त्याचे वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरताना या तीन गोष्टींवरच उमेदवार तग धरू शकणार आहे. त्यामुळे या तीन निकषांचा विचार केल्यास अनुभवहीन युवा नेतृत्व भाजपच्या मुरब्बी नेत्यांसमोर तग धरू शकेल का? अशी शंका काँग्रेसच्या एका गटाकडून व्यक्त केली जात आहे.पक्षाने आदेश दिल्यास स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी ठेवणाºया माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी काही दिवसांपूर्वीच साजऱ्या झालेल्या जल्लोषपूर्ण वाढदिवसाच्या निमित्ताने आपण अजून निवृत्त झालेलो नाही हे दाखवून दिले. तरीही चिरंजीव विश्वजित यांच्या राजकीय भवितव्याच्या हमीवर स्वत: माघार घेऊन डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नावाला ते पाठींबा देऊ शकतात. सुरूवातीला विधानसभेसाठी जास्त इच्छुक असणाऱ्या डॉ.उसेंडी यांनी अलिकडे लोकसभेची ‘रिस्क’ घेणे फायद्याचे समजत तयारी सुरू केली आहे. तिकडे गोंदिया जिल्ह्यातील डॉ.नामदेव किरसान या माजी उत्पादन शुल्क आयुक्तांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन पक्षबांधणीच्या कामात हातभार लावला आहे. त्यामुळे गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी आपणच योग्य पर्याय असल्याचे त्यांनीही पक्षश्रेष्ठींपुढे बिंबवले आहे.वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या निकषावर हे सर्व नेते सरस असले तरी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाने युवा नेते म्हणून डॉ.नितीन कोडवते यांना पुढे करत कामी लागण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ.कोडवते यांनी लोकसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून जनसंपर्क सुरू केला आहे.आ.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांना आहे. मात्र तिकीट आपल्यालाच मिळेल का, याबाबत डॉ.कोडवते स्वत:च साशंकता व्यक्त करीत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस