५० टक्के कृषी वीज बिल सुटीचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:29+5:302021-02-05T08:52:29+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राज्य शासनाने नुकतेच कृषी धाेरण जाहीर केले आहे. यानुसार थकीत कृषी वीज बिलावर लादलेले ...

Take advantage of 50% agricultural electricity bill holiday | ५० टक्के कृषी वीज बिल सुटीचा लाभ घ्या

५० टक्के कृषी वीज बिल सुटीचा लाभ घ्या

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : राज्य शासनाने नुकतेच कृषी धाेरण जाहीर केले आहे. यानुसार थकीत कृषी वीज बिलावर लादलेले व्याज व विलंब आकार माफ केला जाणार आहेत. थकीत बिलाच्या ५० टक्के बिलावर सूट दिली जाणार असून, केवळ ५० टक्के वीज बिल शेतकऱ्यांना भरायचे आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे, असे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांनी केले. राज्य शासनाने कृषी धाेरण २०२० जाहीर केले आहे. या धाेरणाअंतर्गत कृषी वीज बिलाच्या थकबाकीवर विविध सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलतींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, या उद्देशाने २८ जानेवारी राेजी पाेटेगाव मार्गावरील विद्युत भवन कार्यालयात शेतकरी मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला प्रभारी उपविभागीय अभियंता प्रशांत तेलतुंबडे, सहायक अभियंता विनाेद काेल्हटवार, प्रफुल्ल पिंपळकर, संताेष रूद्रशेट्टीवार, पुरुषाेत्तम वंजारी, पुनेश्वर मेश्राम, आदी उपस्थित हाेते.

मेळाव्याला जवळपास ८० शेतकरी उपस्थित हाेते. या धाेरणाबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी जवळपासच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. व्याज व विलंब शुल्क माफ केल्याने मुद्दल रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम भरायची आहे. जास्तीत जास्त शेतकरी थकीत वीज बिल भरतील, अशी अपेक्षा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Take advantage of 50% agricultural electricity bill holiday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.