शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक टिप्पागड यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:12 IST

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात असलेले टिप्पागड हे धार्मिक पर्यटनस्थळ भाविकांसह सर्वांसाठीच एक आकर्षण आहे.

ठळक मुद्दे३० व ३१ जानेवारीला कार्यक्रम : छत्तीसगड सीमेवरील निसर्गरम्य ठिकाणी जमणार हजारो भाविक

हरिश सिडाम ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात असलेले टिप्पागड हे धार्मिक पर्यटनस्थळ भाविकांसह सर्वांसाठीच एक आकर्षण आहे. टिप्पागड हे दोन राज्यांची सांस्कृतिक परंपरा जपणारे ठिकाण आहे. तत्कालीन राजे पुरमशहा यांनी कोरचीपासून ५७ किमी अंतरावरील पहाडावरील या स्थळाला प्रकाशझोतात आणले. तेव्हापासून तिथे यात्रेची परंपरा कायम आहे. यावर्षी ३० व ३१ जानेवारीला भरणाºया यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.चंद्रपूरचा पाचवा राजा बाबाजी बल्लाळशहा यांच्या काळात इ.स.१५७२ ते १५९७ यादरम्यान या गडावर पुरमशहा राजाचे राज्य होते. ‘कोटगूल’ या जमीनदारी स्थळापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर टिप्पागड हे ठिकाण आहे. राजाला राज्यकारभार चालविण्यासाठी व शत्रूचा मुकाबला करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे गडस्थळ आहे. गडचिरोली, अहेरी प्रांतातील १६ जमिदाºयांपैकी व दुर्ग (राजनांदगाव) प्रांतातील चार जमीनदाºयांपैकी कोटगूल हे एक जमीनदारीचे ठिकाण. टिप्पागडचा किल्ला समुद्रसपाटीपासून २५०० ते ३००० फूट उंचीवर आहे. या गडाच्या उत्तर-पूर्वेस ‘न्याहाळकल’, पश्चिमेस ‘खोब्रामेंढा’, उत्तरेस ‘गोडरी’, कोटगुल व दक्षिणेस ‘तलवारगड’ ही गावे आहेत. गडाच्या शिखरावर चढून पश्चिमेस व दक्षिणेस नजर टाकल्यास डोंगराच्या सुंदर रांगा मनाला भुरळ घालतात. गडाच्या सभोवताल दगडाचा तट बांधलेला आहे. गडावर चढण्यासाठी पूर्वेकडून पायºया आहेत. गडावरून खाली उतरण्याचा आतून मार्ग आहे. मुख्य द्वाराला आज गुरु बाबाची गुंफा म्हणतात. गडाच्या मध्यभागी तलाव आहे. तलावालगत हनुमानाची मूर्ती व संतोषी मातेचे मंदिर आहे. या मंदिराला जयश्री मडकुटी मातेचे मंदिर म्हणतात.टिप्पागडचा तलाव राजा पुरमशहा व राणी यांच्या प्रेमाच्या आख्यायिकेवरून श्रद्धाळूंसाठी, प्रेमी युगलांसाठी पवित्र प्रेमाचे प्रतीक मानले जाते.गेल्या अनेक वर्षांपासून टिप्पागडला धार्मिक उत्सव होतो. माघ पौर्णिमेला दूरदूरचे यात्रेकरू मोठ्या उत्साहाने येतात. महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमावर्ती गडावर दोन्ही राज्यातून जनसमुदाय दरवर्षी येतात. दोन दिवस या ठिकाणी उत्सव असतो.यावर्षी ३० व ३१ जानेवारी रोजी दिवस-रात्र भजन, पूजन व सांस्कृतिक कार्यक्र म होतात. या उत्सवात दोन राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडते.शासनाकडून दुर्लक्षितगडावर चढण्यासाठी रस्त्याची व पायऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. गडाच्या तटाच्या दुरु स्तीची गरज आहे. रमणीय स्थळांवर बांधकाम करण्याची, वीज, पाणी तथा अन्य सोयीसुविधांची गरज आहे. शासनाने याकडे लक्ष दिल्यास नागरिकांसाठी सुंदर पर्यटन तथा धार्मिक स्थळ म्हणून येथे गर्दी आणखी वाढू शकते. निसर्गरम्य पर्यटन स्थळ, गड, किल्ले, धार्मिक स्थळ हे प्रांताचे नव्हे राज्याचे सांस्कृतिक वैभव आहे.