शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:55+5:302021-02-05T08:49:55+5:30
शेतकऱ्यांकडील धान खरेदीची मर्यादा १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली, ती वाढवावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या धान ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांना घेराव
शेतकऱ्यांकडील धान खरेदीची मर्यादा १२ क्विंटलवरून ९.६० क्विंटल करण्यात आली, ती वाढवावी, तसेच वनहक्क पट्टेधारक आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीची समस्या मार्गी लावावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले; पण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच शेतकऱ्यांना अडविण्यात आले. यावेळी डॉ. होळी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची विनंती पालकमंत्र्यांना केली. त्यामुळे पालकमंत्री शेतकऱ्यांपुढे आले. धानाची खरेदी तातडीने ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात यावी, बंद अवस्थेत असलेले बोगस इलेक्ट्रॉनिक वजन काटे बदलून चांगल्या दर्जाचे वजन काटे उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच धान खरेदीच्या प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा, अशा मागण्या यावेळी पालकमंत्र्यांपुढे मांडल्या. त्या मान्य करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
शांततापूर्ण मार्गाने झालेल्या या घेराव आंदोलनात जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, समाजकल्याण सभापती रणजिता कोडापे, भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, गडचिरोली पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, भाजप शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुका अध्यक्ष रमरतन गोहणे, याशिवाय विलास भांडेकर, साईनाथ साळवे, भास्कर बुरे, सुरेश शहा, हेमंत बोरकुटे, दिलीप चलाख, मधुकर भांडेकर, साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.