खताच्या ढिगाऱ्यांमुळे शहरात दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:32+5:302021-01-16T04:40:32+5:30
गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल ...

खताच्या ढिगाऱ्यांमुळे शहरात दुर्गंधी
गॅस सिलिंडरधारकांना केरोसिनचा पुरवठा करा
आरमोरी : शासनाने बीपीएलधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण केले आहे. मात्र या बीपीएलधारकांना मिळणारे रॉकेल बंद केल्याने ग्रामीण भागात नागरिकांना फटका बसत आहे. ग्रामीण भागात रॉकेलची गरज सर्वाधिक असते. मात्र शासनाने गॅस देऊन रॉकेल बंद केल्याने गॅस सिलिंडर बीपीएलधारकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पूर्ववत रॉकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाढीव वस्त्यांमध्ये वीज खांब उभारण्याकडे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरातील नवीन वस्त्यांचा विस्तार होत चालला आहे. विस्तारलेल्या वॉर्डात वीज उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. मात्र मागील एक वर्षापासून नगर परिषद वीज खांब उभारण्यास विलंब करीत आहे. घरटॅक्सच्या माध्यमातून नगर परिषदेला लाखो रुपयांचा महसूल गोळा होतो. त्यामुळे वीज खांब उभारून विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
इंजेवारी मार्गाची दुरवस्था कायमच
आरमोरी : तालुक्यातील सिर्सी ते इंजेवारी या मार्गावर जागोजागी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने रहदारी करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गाने बससेवा उपलब्ध आहे.
पुनर्वसित गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष
देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावांचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. किन्हाळा गाव पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाले आहे. मात्र अरततोंडी गाव अर्धेअधिक जुन्याच ठिकाणी आहे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
मानापूर येथे बायपास मार्ग तयार करा
मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्याच्या मानापूर गावातून पिसेवडधाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरिकांनी अतिक्रमण करून अर्धा रस्ता गिळंकृत केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता सिमेंट काँक्रीटची पक्की घरे तयार झाली आहेत. शिवाय संरक्षक भिंतीचे बांधकाम झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला. त्यामुळे दोन वाहने एकाच वेळी जाऊ करू शकत नाहीत. सदर समस्या मार्गी लावण्यासाठी मानापूर येथे बायपास मार्ग निर्माण करण्यात यावा, अशी मागणी आहे.