शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देआंतरजिल्हा वाहतूक : जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यावर द्यावे लागणार हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू दुसऱ्या जिल्ह्यातून बसने प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस विलगीकरण कक्षात राहणे सक्तीचे करणारा आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील अडलेली कामे मार्गी लागणार असल्यामुळे अनेकांनी एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. कोणत्या अटीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकते. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून एसटीने प्रवास करणाऱ्याला १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी काढली आहे.अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्यास्थितीत जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच बसफेऱ्या सुरू कराव्यात. लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल.बसमध्ये सॅनिटायझर असणे आवश्क आहे. प्रवाशाने तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय बसमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवाशाने आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. हे हमीपत्र एसटी वाहकाकडे उपलब्ध राहणार आहेत. सदर हमीपत्र आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्टवर जमा केले जाईल. या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. तर रेडझोन व हॉटस्पॉट मधून येणाऱ्या प्रवाशाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.संबंधीत प्रवाशी खरच विलगीकरणात आहे काय याची खातरजमा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे.नागपूर व चंद्रपूरसाठी १६ फेऱ्याआंतरजिल्हा वाहतूकीला गुरूवारपासून परवानगी दिल्यानंतर गडचिरोली आगारातून नागपूर व चंद्रपूरसाठी प्रत्येकी आठ फेºया सोडण्यात आल्या. मात्र पहिलाच दिवस असल्याने एसटीला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशी मिळाले नाही. पहिला दिवस असल्याने नियोजन करताना एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. तरीही चंद्रपूर, नागपूरसाठी बसफेऱ्या सोडण्यात आल्या. अहेरी आगारातून काही बसफेऱ्या चंद्रपूर व नागपूरसाठी सुटल्या.विलगीकरणाच्या अटीचा बसणार फटकादुसºया जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. याबाबतचे हमीपत्र व संबंधित प्रवाशाची माहिती जिल्ह्यावरील चेकपोस्टवर जमा केली जाणार आहे. एखाद्या नागरिकाला दुसऱ्या जिल्ह्यात काम असले तरी परत येताना त्याला गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची हिंमत करणार नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकही गडचिरोली जिल्ह्यात येणार नाहीत. एकंदरीतच गृहविलगीकरणाच्या अटीमुळे एसटीला अपेक्षित प्रवासी मिळतील का, याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी