शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देआंतरजिल्हा वाहतूक : जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यावर द्यावे लागणार हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू दुसऱ्या जिल्ह्यातून बसने प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस विलगीकरण कक्षात राहणे सक्तीचे करणारा आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील अडलेली कामे मार्गी लागणार असल्यामुळे अनेकांनी एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. कोणत्या अटीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकते. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून एसटीने प्रवास करणाऱ्याला १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी काढली आहे.अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्यास्थितीत जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच बसफेऱ्या सुरू कराव्यात. लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल.बसमध्ये सॅनिटायझर असणे आवश्क आहे. प्रवाशाने तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय बसमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवाशाने आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. हे हमीपत्र एसटी वाहकाकडे उपलब्ध राहणार आहेत. सदर हमीपत्र आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्टवर जमा केले जाईल. या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. तर रेडझोन व हॉटस्पॉट मधून येणाऱ्या प्रवाशाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.संबंधीत प्रवाशी खरच विलगीकरणात आहे काय याची खातरजमा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे.नागपूर व चंद्रपूरसाठी १६ फेऱ्याआंतरजिल्हा वाहतूकीला गुरूवारपासून परवानगी दिल्यानंतर गडचिरोली आगारातून नागपूर व चंद्रपूरसाठी प्रत्येकी आठ फेºया सोडण्यात आल्या. मात्र पहिलाच दिवस असल्याने एसटीला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशी मिळाले नाही. पहिला दिवस असल्याने नियोजन करताना एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. तरीही चंद्रपूर, नागपूरसाठी बसफेऱ्या सोडण्यात आल्या. अहेरी आगारातून काही बसफेऱ्या चंद्रपूर व नागपूरसाठी सुटल्या.विलगीकरणाच्या अटीचा बसणार फटकादुसºया जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. याबाबतचे हमीपत्र व संबंधित प्रवाशाची माहिती जिल्ह्यावरील चेकपोस्टवर जमा केली जाणार आहे. एखाद्या नागरिकाला दुसऱ्या जिल्ह्यात काम असले तरी परत येताना त्याला गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची हिंमत करणार नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकही गडचिरोली जिल्ह्यात येणार नाहीत. एकंदरीतच गृहविलगीकरणाच्या अटीमुळे एसटीला अपेक्षित प्रवासी मिळतील का, याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी