शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’मुळे सर्वसामान्यांना दिलासा, पण गृह विलगिकरणाच्या अटीमुळे वांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देआंतरजिल्हा वाहतूक : जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यावर द्यावे लागणार हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतू दुसऱ्या जिल्ह्यातून बसने प्रवास करून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस विलगीकरण कक्षात राहणे सक्तीचे करणारा आदेश गुरूवारी (दि.२०) जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. मात्र असे असले तरी बाहेर जिल्ह्यातील अडलेली कामे मार्गी लागणार असल्यामुळे अनेकांनी एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. कोणत्या अटीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवेश जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकते. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून एसटीने प्रवास करणाऱ्याला १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी काढली आहे.अधिसूचनेत म्हटले आहे की, सध्यास्थितीत जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच बसफेऱ्या सुरू कराव्यात. लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाही. बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल.बसमध्ये सॅनिटायझर असणे आवश्क आहे. प्रवाशाने तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्याशिवाय बसमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवाशाने आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. हे हमीपत्र एसटी वाहकाकडे उपलब्ध राहणार आहेत. सदर हमीपत्र आरमोरी, देसाईगंज, पारडी, आष्टी, हरणघाट, कोरची या चेकपोस्टवर जमा केले जाईल. या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. तर रेडझोन व हॉटस्पॉट मधून येणाऱ्या प्रवाशाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.संबंधीत प्रवाशी खरच विलगीकरणात आहे काय याची खातरजमा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार आहे.नागपूर व चंद्रपूरसाठी १६ फेऱ्याआंतरजिल्हा वाहतूकीला गुरूवारपासून परवानगी दिल्यानंतर गडचिरोली आगारातून नागपूर व चंद्रपूरसाठी प्रत्येकी आठ फेºया सोडण्यात आल्या. मात्र पहिलाच दिवस असल्याने एसटीला पाहिजे त्या प्रमाणात प्रवाशी मिळाले नाही. पहिला दिवस असल्याने नियोजन करताना एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बरीच दमछाक झाली. तरीही चंद्रपूर, नागपूरसाठी बसफेऱ्या सोडण्यात आल्या. अहेरी आगारातून काही बसफेऱ्या चंद्रपूर व नागपूरसाठी सुटल्या.विलगीकरणाच्या अटीचा बसणार फटकादुसºया जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. याबाबतचे हमीपत्र व संबंधित प्रवाशाची माहिती जिल्ह्यावरील चेकपोस्टवर जमा केली जाणार आहे. एखाद्या नागरिकाला दुसऱ्या जिल्ह्यात काम असले तरी परत येताना त्याला गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे तो दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची हिंमत करणार नाही. तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकही गडचिरोली जिल्ह्यात येणार नाहीत. एकंदरीतच गृहविलगीकरणाच्या अटीमुळे एसटीला अपेक्षित प्रवासी मिळतील का, याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :state transportएसटी