शालेय विद्यार्थ्यांच्या पाेषण आहारात मसाला, तेलाला दिली बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:59+5:302021-02-05T08:53:59+5:30

गडचिराेली : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी तसेच ती टिकून राहावी, तसेच त्यांना पोषण आहार मिळावा ...

Spices and oils in the diet of school children | शालेय विद्यार्थ्यांच्या पाेषण आहारात मसाला, तेलाला दिली बगल

शालेय विद्यार्थ्यांच्या पाेषण आहारात मसाला, तेलाला दिली बगल

गडचिराेली : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी तसेच ती टिकून राहावी, तसेच त्यांना पोषण आहार मिळावा म्हणून सर्व शाळांमध्ये शालेय पाेषण आहार याेजना कार्यान्वित केली. कोरोनाकाळानंतर शाळा सुरू झाल्या तरी पोषण आहाराचे साहित्य अजूनही घरपोचच दिले जात आहे. पण त्यात केवळ डाळ-तांदूळ दिले जात असून मसाला, तेल यासारख्या पदार्थांसाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नसल्याचे दिसून येत आहे.

पोषण आहार याेजनेअंतर्गत आधी दुपारच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तयार झालेले भाेजन दिले जात हाेते. काेराेनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी या याेजनेची अंमलबजावणी थांबविण्यात आली. आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार शाळा सुरू झाल्या असल्या तरी या याेजनेअंतर्गत एकाही शाळेमध्ये प्रत्यक्ष भाेजन तयार केले जात नसल्याचे दिसून येते. लाभार्थी विद्यार्थ्यांना घरपाेच डाळ व तांदळाचा पुरवठा केला जात आहे. पण या पुरवठ्यातून मसाला व तत्सम पदार्थ गायब झाले आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या दीड हजार आसपास शाळा आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. काेराेना महामारीची समस्या आटाेक्यात आल्यानंतर २३ नाेव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविणे सुरू झाले. या वर्गात सुरुवातीला विद्यार्थी उपस्थिती कमी हाेती. मात्र कालांतराने विद्यार्थी उपस्थिती वाढू लागली. आता या वर्गांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थिती आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सर्व शाळांमध्ये भरविले जात आहेत. या वर्गांमध्ये सरासरी ५५ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थिती आहे.

बाॅक्स...

९००१८

जिल्ह्यातील पाेषण आहार लाभार्थी

.........................

२४३६

शहरी लाभार्थी

.......................

८७५८२

ग्रामीण लाभार्थी

काेट....

विद्यार्थ्यांना ज्या वस्तू घरपाेच देणे शक्य आहे, अशा तांदूळ व विविध प्रकारच्या डाळी अर्थात कडधान्य दिले जात आहे. शाळांमध्ये वर्ग सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष भाेजन तयार करून ते विद्यार्थ्यांना देण्याबाबत शासनाकडून काेणतेही आदेश सध्या प्राप्त झाले नाहीत.

- वैभव बारेकर, लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, गडचिराेली

बाॅक्स....

शाळेतील भाेजनाला ब्रेक

शालेय पाेषण आहार याेजनेअंतर्गत शाळांना तांदूळ व मूग, मसूर डाळीचा पुरवठा केला जाताे. याशिवाय वाटाणा, मटकी, तेल, तिखट, मीठ, जिरा, हळद आदींचाही पुरवठा हाेताे. शिवाय मुख्याध्यापक आपल्यास्तरावर कांदा, लसूण, टमाटर, काेथिंबीर आदी वस्तूंची खरेदी करतात. शाळास्तरावर स्वयंपाकी ठेवून भाेजन तयार करून ते विद्यार्थ्यांना शाळेतच दिले जाते. भाेजनानंतर शाळेचे दुसरे सत्र सुरू हाेते. मात्र काेराेना संसर्गाच्या महामारीने शाळेतील तयार भाेजनाला ब्रेक लागला आहे.

Web Title: Spices and oils in the diet of school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.