शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

खरीपपूर्व शेती मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:33 IST

गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत.

ठळक मुद्देसकाळी शेतांमध्ये गर्दी : काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकण्याची कामे जोमात

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतांमध्ये शेतकरी व मजुरांची गर्दी दिसून येते.खरीपपूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीया सणानंतर या कामाला वेग आला आहे. शेतातील पाळींवर उरलेले तूर व तिळाचे देठ, तसेच शेतातील तणस घरी नेणे यासारखी कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी बैलबंडीद्वारे शेणखत टाकत आहेत तर ज्यांच्याकडे बैलबंडी नाही, असे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेणखत टाकत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे पेरणी, कापणी, मळणी ही कामे लांबतात. परिणामी धान उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. धानाला मिळणारा भाव मात्र अद्यापही धानपट्ट्यातील ज्वलंत समस्या आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीतून धानपिकाला लागणारा खर्च वजा करता धानाची विक्री करून हातात काहीच शिल्लक राहत नाही, असे शेतकरी सांगतात.तीन दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले, परंतु शेती विभागली. मनुष्यबळही कमी झाले. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्र, अवजारे आली. त्यामुळे जनावरांची गरज कमी भासू लागली. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाले. याचा परिणाम शेणखतावर झाला. पूर्वी अनेक गावाच्या बाहेर शेणखताचे मोठमोठे ढिगारे दिसून येत असत. परंतु आता ते अत्यल्प कमी आहेत. ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची समज आहे, असे अनेक शेतकरी शेणखत विकत घेऊन शेतात टाकतात. सध्या कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे अनेकांना रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहित होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कल आहे.पशुधन घटल्याने पेरणीकाळात मशागतीवर परिणामकाही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हैस, शेळ्या यासारखी जनावरे होती. संयुक्त कुटुंबात जेवढे सदस्य अधिक त्यापेक्षा जनावरांची संख्या जास्त होती. जनावरांची देखभाल कुटुंबातील प्रत्येक सदस्य करायचा. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले. प्रत्येक गावांमध्ये यांत्रिक साधने असले तरी वेळीच ती उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांना पेरणीकाळात मशागतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

टॅग्स :agricultureशेती