शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

खरीपपूर्व शेती मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:33 IST

गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत.

ठळक मुद्देसकाळी शेतांमध्ये गर्दी : काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकण्याची कामे जोमात

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतांमध्ये शेतकरी व मजुरांची गर्दी दिसून येते.खरीपपूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीया सणानंतर या कामाला वेग आला आहे. शेतातील पाळींवर उरलेले तूर व तिळाचे देठ, तसेच शेतातील तणस घरी नेणे यासारखी कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी बैलबंडीद्वारे शेणखत टाकत आहेत तर ज्यांच्याकडे बैलबंडी नाही, असे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेणखत टाकत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे पेरणी, कापणी, मळणी ही कामे लांबतात. परिणामी धान उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. धानाला मिळणारा भाव मात्र अद्यापही धानपट्ट्यातील ज्वलंत समस्या आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीतून धानपिकाला लागणारा खर्च वजा करता धानाची विक्री करून हातात काहीच शिल्लक राहत नाही, असे शेतकरी सांगतात.तीन दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले, परंतु शेती विभागली. मनुष्यबळही कमी झाले. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्र, अवजारे आली. त्यामुळे जनावरांची गरज कमी भासू लागली. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाले. याचा परिणाम शेणखतावर झाला. पूर्वी अनेक गावाच्या बाहेर शेणखताचे मोठमोठे ढिगारे दिसून येत असत. परंतु आता ते अत्यल्प कमी आहेत. ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची समज आहे, असे अनेक शेतकरी शेणखत विकत घेऊन शेतात टाकतात. सध्या कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे अनेकांना रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहित होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कल आहे.पशुधन घटल्याने पेरणीकाळात मशागतीवर परिणामकाही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हैस, शेळ्या यासारखी जनावरे होती. संयुक्त कुटुंबात जेवढे सदस्य अधिक त्यापेक्षा जनावरांची संख्या जास्त होती. जनावरांची देखभाल कुटुंबातील प्रत्येक सदस्य करायचा. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले. प्रत्येक गावांमध्ये यांत्रिक साधने असले तरी वेळीच ती उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांना पेरणीकाळात मशागतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

टॅग्स :agricultureशेती