शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

खरीपपूर्व शेती मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:33 IST

गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत.

ठळक मुद्देसकाळी शेतांमध्ये गर्दी : काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकण्याची कामे जोमात

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू संकलनाचे काम सुरू आहे. परंतु सदर काम अनेक गावांमध्ये नाही. ज्या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे, अशा गावांसह अन्य गावांमध्येही शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सध्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावातील शेतांमध्ये शेतकरी व मजुरांची गर्दी दिसून येते.खरीपपूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे अक्षय तृतीया सणानंतर या कामाला वेग आला आहे. शेतातील पाळींवर उरलेले तूर व तिळाचे देठ, तसेच शेतातील तणस घरी नेणे यासारखी कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी बैलबंडीद्वारे शेणखत टाकत आहेत तर ज्यांच्याकडे बैलबंडी नाही, असे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेणखत टाकत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशिरा येत आहे. त्यामुळे पेरणी, कापणी, मळणी ही कामे लांबतात. परिणामी धान उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. धानाला मिळणारा भाव मात्र अद्यापही धानपट्ट्यातील ज्वलंत समस्या आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीतून धानपिकाला लागणारा खर्च वजा करता धानाची विक्री करून हातात काहीच शिल्लक राहत नाही, असे शेतकरी सांगतात.तीन दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले, परंतु शेती विभागली. मनुष्यबळही कमी झाले. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्र, अवजारे आली. त्यामुळे जनावरांची गरज कमी भासू लागली. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाले. याचा परिणाम शेणखतावर झाला. पूर्वी अनेक गावाच्या बाहेर शेणखताचे मोठमोठे ढिगारे दिसून येत असत. परंतु आता ते अत्यल्प कमी आहेत. ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची समज आहे, असे अनेक शेतकरी शेणखत विकत घेऊन शेतात टाकतात. सध्या कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे अनेकांना रासायनिक खतांचे दुष्परिणाम माहित होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे कल आहे.पशुधन घटल्याने पेरणीकाळात मशागतीवर परिणामकाही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हैस, शेळ्या यासारखी जनावरे होती. संयुक्त कुटुंबात जेवढे सदस्य अधिक त्यापेक्षा जनावरांची संख्या जास्त होती. जनावरांची देखभाल कुटुंबातील प्रत्येक सदस्य करायचा. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले. प्रत्येक गावांमध्ये यांत्रिक साधने असले तरी वेळीच ती उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांना पेरणीकाळात मशागतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.

टॅग्स :agricultureशेती