शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अवघ्या तीन किलोमीटरवर होते गाव, तेवढ्यात नियतीने साधला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 10:36 IST

विजेने घेतला चौघांचा बळी: दर्दी गायक गेेल्याने गहिवरले रसिक, आमगाव बुट्टीवर शोककळा

पुरुषोत्तम भागडकर

देसाईगंज : खेळ कुणाला दैवाचा कळला... या ओळींची प्रचिती २४ एप्रिलला देसाईगंजमध्ये आली. नातेवाईकाचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्रूा एका कुटुंबाने ५० किलोमीटर अंतर दुचाकीवरुन कापले होते. गाव अवघ्या तीन किलोमीटरवर असताना पावसाने गाठले. मात्र, चोरपावलांनी पावसामागून काळ आल्याची कल्पना या निष्पाप कुटुंबाला नव्हती. वीज कडाडल्याने दोन चिमुकल्या भयभीत झाल्यामुळे दाम्पत्याने झाडाखाली आश्रय घेतला, पण विजेने नेमका या झाडाचाच वेध घेतला. वीज कोसळल्याने चौघेही एका क्षणांत मृत्यूमुखी पडले. गाव अदी जवळ असताना नियतीने डाव साधला.

भारत लक्ष्मण राजगडे (३८,रा.आमगाव बुट्टी ता.देसाईगंज) यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नोकरी लागली नाही. शिक्षण घेतानाच गायन व नाट्यकला अवगत केली. त्यालाच जगण्याचे साधन बनवून ते व्यावसायिक नाटकांत गायनाचे काम करत. १२ वर्षांपूर्वी वडील गेले. तिन्ही बहिणी लग्न होऊन सासरी गेल्या. घरात ६५ वर्षांची आई पुष्पा, पत्नी अंकिता (३०), देव्यांशी (५) व मनस्वी (३) या गोंडस मुली. असा हा पाच जणांचा कुटुंबकबिला.

भारत राजगडे हेच कुटुंबात एकमेव कमावते. पत्नी अंकिता यांच्या चुलत आत्याचा विवाह समारंभ २४ एप्रिलला गळगला (ता. कुरखेडा) येथे पार पडला. या सोहळ्यासाठी राजगडे कुटुंबीय तीन दिवसआधीच सासरवाडी चिखलढोकळा (ता.कुरखेडा) येथे गेेले होते. लग्नसमारंभ उरकल्यावर दुपारी दोन वाजता पत्नी व दोन मुलींना घेऊन भारत राजगडे दुचाकीवरून कुरखेडा- देसाईगंजमार्गे आमगाव बुट्टीला जाण्यासाठी निघाले. गाव तीन किलोमीटरवर असताना तुळशी फाटा येथे मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुचाकी रस्त्यालगत उभी करून ते एका झाडाच्या आडोशाला गेले होते. मात्र, काही वेळांतच वीज कोसळली अन् चौघेही एकाचवेळी मृत्युमुखी पडले.

काळजाचा ठाव घेणारा दर्दी गायक शेवटी रडवून गेला...

भारत राजगडे यांनी गावात भजनी मंडळ स्थापन केले होते. काही नाटकांतही त्यांनी गायनाचे काम केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन व गवळणी गाऊन ते जनजागरण करत. काळजाचा ठाव घेणाऱ्या गायनामुळे रसिक त्यांना डोक्यावर घेत. गायन कलेतून सर्वांचे मनोरंजन करणारा हा दर्दी गायक २४ एप्रिलला रसिकांना रडवून गेला.

नातेवाईकांचा टाहो, फुटला अश्रूंचा बांध

एकाचवेळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने राजगडे कुटुंबाच्या घरी व देसाईगंज रुग्णालयात नातेवाईक व गावकऱ्यांनी गर्दी केली. वयोवृद्ध पुष्पा यांच्यासह अंकिता राजगडेची आई सत्यवती व वडील माणिक दरवडे यांनी एकच आक्रोश केला, त्यामुळे उपस्थितांचे हृदय हेलावले. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली