शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

दोन तिरडींवरून चौघांची अंत्ययात्रा, आमगावात फुटला अश्रूंचा बांध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 10:37 IST

विजेचे बळी : ‘हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...’ भारत राजगडेंचे स्वर झाले मुके

पुरुषोत्तम भागडकर

देसाईगंज (जि. गडचिरोली) : कर्ता लेक, सून अन् दोन निरागस चिमुकल्या नातींचे मृतदेह पाहून ६५ वर्षांच्या आजीने एकच आक्रोश केला. दोन तिरड्यांवर चौघांची अंत्ययात्रा निघाली. हे चित्र काळीज हेलावणारे होते. शोकमग्न नातेवाईक, हुंदके अन् अश्रूंचा बांध फुटल्याने आमगाव बुट्टी गाव शोकसागरात बुडाले होते.

सासुरवाडीत नातेवाइकाचा लग्न समारंभ आटोपून दुचाकीवरून गावी परतताना नाट्यकलावंत व गायक भारत लक्ष्मण राजगडे (वय ३७) यांच्या कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. भारत लक्ष्मण राजगडे यांच्यासह पत्नी अंकिता (३०), तसेच देव्यांशी (५) व मनस्वी (३) या चिमुकल्यांचा कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे २४ एप्रिलला सायंकाळी वीज कोसळून मृत्यू झाला. मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाल्याने भारत राजगडे हे झाडाखाली थांबले अन् तेथेच या सर्व निष्पाप कुटुंबाला मृत्यूने गाठले.

भारत राजगडे यांनी भजनी मंडळ स्थापन करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत बक्षिसे पटकावली होती. नाटकांमध्ये गायनाचे कामही ते करत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भजने गाऊन त्यांनी देसाईगंज तालुक्यासह परिसरात नावलौकिक मिळविला होता. ‘आमुचा तू आमुचा तू सवंगडी... परी करीशी तू आपली खोडी... हरी तुझ्या खेळाचे भय वाटे...’ अशा भजनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारत राजगडे यांचे स्वर मुके झाले. रसिकांना पोरके करून गेलेल्या भारत राजगडे यांच्या आठवणी जागवत त्यांनी गायलेल्या भजनांच्या चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

गावात चूल पेटली नाही

वीज कोसळल्याच्या घटनेने भारत राजगडे यांच्यासह पत्नी व दोन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले. घरात केवळ वयोवृद्ध पुष्पाबाई याच आहेत. या चौघांचा मृत्यू गावाला चटका लावून गेला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, एकाही घरात चूल पेटली नाही. संपूर्ण गावकऱ्यांनी पुष्पाबाई राजगडे यांच्या घराजवळ गर्दी केली होती.

मृतदेह पाहून फोडला टाहो

४ रोजी सकाळी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८ वाजता चारही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी आमगाव बुट्टी येथे नेण्यात आले. घराजवळ रुग्णवाहिका पोहोचल्यावर मृतदेह पाहून भारत राजगडे यांच्या शोकमग्न आई पुष्पाबाई राजगडे यांनी टाहो फोडला. काही वेळ त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना नातेवाइकांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संपूर्ण अंत्यविधी होईपर्यंत त्या स्तब्ध होत्या.

साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

भारत व अंकिता या दोघांचे पार्थिव वेगवेगळ्या तिरडीवर ठेवले होते. भारत यांच्यासह मोठी मुलगी देव्यांशी, तर आई अंकितासह धाकट्या मनस्वीचे पार्थिव ठेवले होते. अंत्यविधीला आमदार कृष्णा गजबे यांच्यासह हजारोंची गर्दी होती. काळीज हेलावणारे हे दृश्य होते. वैनगंगा नदीकाठी या चौघांचा एकाच ठिकाणी दफनविधी करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली