अवैध वाहतूकदारांची चांदीच चांदी
By Admin | Updated: June 7, 2014 23:56 IST2014-06-07T23:56:00+5:302014-06-07T23:56:00+5:30
छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला या दुर्गम गावांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील खासगी वाहतुकदारांना

अवैध वाहतूकदारांची चांदीच चांदी
आसरअल्ली : छत्तीसगड-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला या दुर्गम गावांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील खासगी वाहतुकदारांना सध्या अच्छे दिन आले आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला नाहक भुर्दंड बसत आहे.
सिरोंचा तालुक्यातील पातागुडम, कोर्ला, सोमनपल्ली, कोपेल्ला हे दुर्गम गाव आहेत. या परिसरातील अनेक लहान गावे या गावांशी जोडलेले आहेत. मोठय़ा लोकसंख्येची ही गाव असून या तुलनेत दळणवळणाचे साधन अत्यल्प आहेत. या भागातील नागरिकांना भाजीपाला व जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठय़ा गावात तसेच तालुका मुख्यालयी जावे लागते. मात्र राज्य परिवहन महामंडळाने ऑक्टोबर महिन्यापासून या भागातील बससेवा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल आहे. याचा गैरफायदा खासगी अवैध वाहतुकदार घेत आहेत. १0 किमीच्या अंतरासाठी ३0 रूपये तर ३0 किमीच्या अंतरासाठी ८0 ते १00 रूपयाची आकारणी खासगी वाहतुकदार करीत आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस १0 आणि ३0 रूपयात एवढय़ा अंतराचा प्रवास करवून देते. खासगी वाहनांच्या टपावर बसूनही प्रवास केला तरी ३५ ते ४0 रूपये प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. खासगी अवैध वाहतुकदारांची वाहने मोजकी असल्याने व प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने खासगी वाहनांच्या दाराला लटकून तसेच टपावर बसून लोक प्रवास करीत आहे. या भागातील लोक प्रतिनिधीचे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. अनेक प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)