शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

जादा दराने रासायनिक खते विक्री, गडचिरोलीतील सात दुकानांचे परवाने केले कायमचे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:43 IST

कृषी विभागाची कारवाई : कृषी सेवा केंद्रांमधून ७४ लाखांची मुदतबाह्य कीटकनाशके जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जादा दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या, तसेच साठापुस्तक अद्ययावत न ठेवणाऱ्या सात कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. कृषी विभागाकडून ही कारवाई आठवडाभरात करण्यात आली. विशेष म्हणजे, ७४ लाख रुपये किमतीची मुदतबाह्य कीटकनाशके व तणनाशके कृषी विभागाने जप्त केली. ती नष्ट करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अधिक नफा प्राप्त करण्यासाठी कृषी केंद्रचालक जादा दराने खते, कीटकनाशके, तणनाशके तसेच बियाणांची विक्री करतात. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. कृषी विभागाकडून वारंवार सूचना देऊनही काही केंद्रचालक मनमानीपणे जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री करतात. अशा केंद्रचालकांवर कृषी विभागाची यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच करडी नजर आहे. त्यानुसार कृषी विभागाने बाराही तालुक्यात गुणनियंत्रक निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

कृषी केंद्रचालकांकडून केल्या जाणार गैरव्यवहाराची तसेच आर्थिक लुटीविरोधात तक्रार करण्यासाठी मोबाइल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तक्रारी कराव्या, असे कृषी विभागाने कळविले आहे.

२३ केंद्रचालकांना बजावली नोटीस

  • कृषी विभागाच्या वतीने केंद्रचालकांची तपासणी करून परवाने रद्द, निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय देसाईगंज व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन अशा ४ सुनावण्या पूर्ण झालेल्या आहेत.
  • खत साठा तफावत व तक्रारी आलेल्या २३ केंद्रचालकांना या आठवड्यात नोटीस बजावलेली आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासे न आल्यास पुन्हा सुनावणी घेऊन आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

का झाली कारवाई?कृषी केंद्र चालकांकडून ई-पॉस मशीनवर खतांचा साठा ताळमेळ न ठेवणे, जादा दराने विक्री करणे, साठा पुस्तक अद्ययावत न करणे, साठा फलक न लावणे, नियमानुसार खताची विक्री न करणे आदी कारणांमुळे कृषी विभागाने कारवाई केली.

या क्रमांकावर करावी तक्रारकृषी केंद्र चालकांकडून रायायनिक खतांची चढ्या दराने विक्री होत असल्यास किंवा कोणताही गैख्यवहार सुरू असल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधा. यासाठी ८२७५६९०१६९ क्रमांकावर तक्रार करावी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

येथे केली कारवाईकृषी विभागाने चामोर्शी तालुक्यात रासायनिक खत विक्रीचे दोन परवाने व कीटकनाशक विक्रीचा १ परवाना असे तीन परवाने रद्द केले, तर खते विक्रीचे दोन परवाने निलंबित केले. धानोरा तालुक्यात बियाणे विक्रीचे दोन परवाने व खत विक्रीचा एक परवाना असे तीन परवाने रद्द केले. आरमोरी तालुक्यात रासायनिक खते विक्रीचा एक परवाना रद्द केला. कृषी विभागाकडून केंद्रांची तपासणी केली जात असून कारवाई सुद्धा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

"कृषी केंद्र धारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरातच रासायनिक खतांची विक्री करावी. प्रत्येक शेतकऱ्याला पक्की पावती द्यावी आणि कोणत्याही गैरकृत्यापासून दूर राहावे. केंद्राविरोधात कोणतीही तक्रार आल्यास व चौकशीत दोषी आढळल्यास कृषी केंद्र परवाना रद्द करण्यापासून ते फौजदारी गुन्हा दाखल करण्यापर्यंतची कारवाई केली जाईल."- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFertilizerखते