१४ ग्रामसभेची तेंदू संकलनात सरशी
By Admin | Updated: June 8, 2014 23:52 IST2014-06-08T23:52:21+5:302014-06-08T23:52:21+5:30
सन १९९६ चा पेसा कायदा व २00६ चा सामुहिक वनहक्क अधिनियमानुसार ग्रामसभेला त्यांच्या परिसरात येणार्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी

१४ ग्रामसभेची तेंदू संकलनात सरशी
गडचिरोली : सन १९९६ चा पेसा कायदा व २00६ चा सामुहिक वनहक्क अधिनियमानुसार ग्रामसभेला त्यांच्या परिसरात येणार्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा हक्क प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी करणारा गडचिरोली जिल्हा प्रथम ठरला. याच कायद्याअन्वये जिल्ह्यातील १४ ग्रामसभेने पुढाकार घेऊन यंदाच्या तेंदू हंगामात एकूण ९८.५५ टक्के तेंदू संकलन केले आहे.
जिल्ह्यातील पाच वनविभागांतर्गत १६0 तेंदू युनिट आहेत. यापैकी यंदा ११0 तेूंद युनिटमध्ये तेंदू संकलनाचे काम झाले. १४ तेंदू युनिट ग्रामसभेला देण्यात आले. यात गडचिरोली वनविभागातील महावाडा, सावरगाव, वडसा वनविभागातील वैरागड ग्रामसभेचा समावेश आहे. आलापल्ली वनविभागात वेगनूर-गरंजे, रेगडी, बोलेपल्ली, पोटेपल्ली-मक्केपल्ली, मत्तेगुडा, वेडमपल्ली आदी सहा ग्रामसभेला तेंदू संकलनाचे कंत्राट देण्यात आले. भामरागड वनविभागातील एटापल्ली व गेदा या दोन ग्रामसभांना तेंदू संकलनाचे काम देण्यात आले. सिरोंचा वनविभागात ३ तेंदू युनिट ग्रामसभांना देण्यात आले. यात छल्लेवाडा-कोरेपल्ली, रेगुलवाही-तिमरन-करंचा आणि असरअल्ली-अंकिसा आदी ग्रामसभांना समावेश आहे.
गडचिरोली वनविभागातील दोन ग्रामसभांनी यंदा ३४८४.५६५ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी ९९.५६ आहे. वडसा वनविभागातील एका ग्रामसभेने १५९९.७७५ प्रमाणित गोणी संकलन केले असून याची टक्केवारी ९८.७५ आहे. आलापल्ली वनविभागातील सहा ग्रामसभांनी एकूण १0८६१.७४५ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी १0२.९५ आहे. भामरागड वनविभागातील दोन ग्रामसभांनी यंदा एकूण २९९0.२९0 इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी ६८ आहे. सिरोंचा वनविभागातील ३ ग्रामसभांची यंदाच्या तेंदू संकलनाची टक्केवारी ९२.७३ आहे. या ग्रामसभांनी एकूण ८५३0.७0५ इतके प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले आहे. १४ ग्रामसभांनी मिळून यंदा एकूण २७४६७.८0 प्रमाणित गोणी तेंदू संकलन केले असून याची टक्केवारी ९८.५५ आहे. ग्रामसभांमार्फत यंदा २६ मे ते १ जून २0१४ या कालावधीत तेंदू संकलनाचे काम करण्यात आले. कंत्राटदारांनी न खरेदी केलेल्या तेंदू युनिटच्या हद्दीत ग्रामसभेच्या पुढाकारामुळे मजूरांना रोजगार मिळाला.