शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

रेतीघाटांचे लिलाव लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:00 AM

गेल्यावर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये रेतीघाटांच्या लिलावासंदर्भात नवीन धोरण आले. त्यानुसार सर्व्हेक्षण करून पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यास एप्रिल महिना उजाडला. जिल्ह्यातील ३८ घाटांचा प्रस्तावही राज्याच्या पर्यावरण समितीकडे गेला. पण त्या समितीने या प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देण्यासोबतच अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी रेतीघाटांचा लिलाव होणे आवश्यक होते.

ठळक मुद्देपर्यावरण विभाग उदासीन : गेल्यावर्षीच्या ३८ घाटांचा प्रस्तावही धुळखात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/सिरोंचा : अनेक मोठ्या नद्यांची देण लाभलेल्या आणि त्यांच्या रेतीघाटांमधून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळवून देणाऱ्या या जिल्ह्यात यावर्षीही पर्यावरण विभागाच्या उदासिनतेमुळे रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीच्या घाटांच्या लिलावासाठी एप्रिल महिन्यात पाठवलेल्या प्रस्तावालाच अजून पर्यावरण आघात मुल्यांकन समितीने हात घातलेला नाही. अशा स्थितीत यावर्षीच्या घाटांचे सर्व्हेक्षण कधी होणार, त्याचा प्रस्ताव कधी जाणार आणि पर्यावरण समिती त्याला कधी मंजुरी देणार हे सर्व अधांतरी आहे.गेल्यावर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये रेतीघाटांच्या लिलावासंदर्भात नवीन धोरण आले. त्यानुसार सर्व्हेक्षण करून पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यास एप्रिल महिना उजाडला. जिल्ह्यातील ३८ घाटांचा प्रस्तावही राज्याच्या पर्यावरण समितीकडे गेला. पण त्या समितीने या प्रस्तावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देण्यासोबतच अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी रेतीघाटांचा लिलाव होणे आवश्यक होते.जिल्ह्यात सर्वाधिक महागडे रेतीघाट सिरोंचा तालुक्यात आहेत. या तालुक्यात आठ घाट आहेत. आता पावसाळा संपून आॅक्टोबर महिना लागल्यामुळे यावर्षीतरी घाटांचा लिलाव लवकर होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील अशी सर्वांना अपेक्षा आहे. दरम्यान अंकिसा माल येथे जप्त केलेल्या १४४ ब्रास रेतीचा साठा उपलब्ध आहे. शासकीय दराने ती रेती बांधकामांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.शेतातील वाळूच्या प्रकरणांना मंजुरीदरम्यान सध्या नदीकाठावरील शेतात पुराच्या पाण्यामुळे साचलेल्या वाळूच्या विक्री प्रकरणांना मंजुरी देण्याचे काम सुरू होत आहे. तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जिल्हा खनिकर्म विभागाकडून त्याला मंजुरी दिली जाते.

टॅग्स :sandवाळू