शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

ग्रामीण भागात सुरक्षित अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काही भाजीपाला व किराणा दुकानदारांनी चुन्याने चौकोनी तर काहींनी वर्तुळ आखले आहे. त्याच ठिकाणी उभे राहून ग्राहकांना सामान घ्यायचे आहे. दुकानाजवळच्या वर्तुळातील ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर मागे असलेला ग्राहक रिकाम्या वर्तुळात सरकतो. या पद्धतीमुळे गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देदुकानदारांनी चुन्याने आखले वर्तुळ, चौकोन : शहरी भागात मात्र तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासन, प्रशासन व आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गरजेच्या वस्तू खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी किराणा दुकान, बेकरी, फळ व भाजीपाला दुकानांसमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर चौकोनी डबे आखले आहेत. चामोर्शी, एटापल्ली शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना दुकानदारांनी सुरू केली आहे. या सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करण्याच्या व्यवस्थेमुळे एकापासून दुसऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे.दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काही भाजीपाला व किराणा दुकानदारांनी चुन्याने चौकोनी तर काहींनी वर्तुळ आखले आहे. त्याच ठिकाणी उभे राहून ग्राहकांना सामान घ्यायचे आहे. दुकानाजवळच्या वर्तुळातील ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर मागे असलेला ग्राहक रिकाम्या वर्तुळात सरकतो. या पद्धतीमुळे गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे. चामोर्शी शहरातही काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर चुन्याने वर्तुळ आखून त्याच ठिकाणी उभे राहून वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. एटापल्ली येथील काही किराणा दुकानदारांनीआपल्या दुकानासमोर आडवे बांबू लावले. दुकानाच्या आतमध्ये ग्राहकाला प्रवेश न देता आवश्यक वस्तू त्या बांबूजवळ नोकरांकरवी आणून दिल्या जात आहे. एक-एक ग्राहकांना वस्तू घेऊन परत पाठविले जात आहे.लॉकडाऊनच्या या परिस्थितीत दूध, किराणा, भाजीपाला व औषधी आदी वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची दुकाने कडकडीत बंद आहेत. बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्या. इतर लोकांपासून आवश्यक अंतर ठेवून आपले व्यवहार पूर्ण करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गडचिरोली शहरासह बाराही तालुकास्तरावरील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. मात्र इतर बाजारपेठ बंद आहे.गडचिरोलीतील किराणा दुकानांत नियमबाह्य गर्दीविशिष्ट अंतर ठेवून ग्राहकाला किराणा देण्याच्या नियमाची ग्रामीण भागात अंमलबजावणी सुरू झाली असली तरी गडचिरोली शहरातील अनेक किराणा दुकाने, सुपर मार्केटमध्ये बुधवारी गर्दी कायम होती. विशिष्ट अंतरावर उभे राहण्याबाबत कोणत्याही सूचनेचे पालन त्यांच्याकडून केले जात नव्हते. हे चित्र असेच राहिले तर संचारबंदीच्या आदेशाचा उद्देश कितपत यशस्वी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गुजरीतही विशिष्ट अंतराची अंमलबजावणी सुरूआठवडी बाजार वगळता दैनंदिन भाजीपाला मिळण्याचे गडचिरोलीतील एकमेव ठिकाण असलेल्या गुजरीत नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वृत्त बुधवारी लोकमतने प्रकाशित करताच त्याचा परिणाम दिसून आला. गुजरीतील भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर चुन्याने वर्तुळ आखून सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री सुरू केली. भाजीपाला दुकानाजवळ ग्राहकांनी गर्दी करू नये, आखून दिलेल्या जागेतच उभे राहून भाजीपाल्याची खरेदी करावी, असे गुजरीतील दुकानदार ग्राहकांना सांगत आहेत.उत्साही लोकांना पोलिसांनी पांगविलेप्रशासनाने १४४ कलम लागू करून संचारबंदी केली. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. मात्र काही अतिउत्साही लोक तसेच काही युवक मुख्य रस्त्यावर तसेच जिल्हा स्टेडियमवर जमाव करीत असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने धानोरा, चामोर्शी मार्गासह स्टेडियम परिसरात जाऊन त्यांना हुसकावून लावले, पण पुन्हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास काही लोकांनी धानोरा मार्गावर जमाव करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तिथे पोहोचताच लोक आपापल्या घरी परतले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस