शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

पथदिव्यांच्या वीजबिलाचे 33 काेटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. 

ठळक मुद्देवर्षभर कराचा भरणाच नाही; ग्रामपंचायतींना महावितरणने धाडल्या नाेटीस

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ग्रामपंचायत, नगर परिषदा व नगर पंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलाचे सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपये थकले आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वसुली अभियान सुरू केले असून, थकीत वीजधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. याचा फटका पथदिव्यांनाही बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न अतिशय मर्यादित असल्याने या उत्पन्नातून पथदिव्यांचे वीजबिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य हाेत नाही. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी यापूर्वी जिल्हा परिषदेकडे हाेती. आता ही जबाबदारी राज्य शासनाकडे साेपविण्यात आली आहे. वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना नाेटीस पाठविल्या जात आहेत. मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिलाचा भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागून वीज वापराची माहिती पंचायत समितीकडे सादर करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात वीज बिल मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महावितरणचेही चुकले

घरगुती, वाणिज्य व औद्याेगिक ग्राहकांना दर महिन्याला वीजबिल पाठविले जाते. मात्र पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायतीला दर महिन्याला दिले जात नाही. त्यामुळे वर्षभर ग्रामपंचायत प्रशासनही वीजबिल भरण्याची प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करते. मार्च महिन्याच्या शेवटी महावितरणकडून नाेटीस पाठविली जाते. त्यानंतर वीजबिल भरण्याची प्रक्रिया सुरू हाेते. मात्र ही प्रक्रिया अतिशय लांब असल्याने मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिल भरले जात नाही. 

वीजबिल वसुलीतून प्राप्त हाेणाऱ्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के महसूल केवळ वीज खरेदीवर खर्च हाेते. उर्वरित रक्कम प्रशासन व इतर बाबींवर खर्च हाेते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते. नंतर वीजबिल देते. इतर सेवांमध्ये मात्र प्रथम पैसे माेजावे लागतात. नंतरच सेवा मिळते. याचा विचार करून नागरिकांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल वसुलीची माेहीम महावितरणने सुरू केली आहे. काेणत्याही प्रकारच्या ग्राहकाकडे वीजबिल थकले असल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल. - सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

चंद्रपूरपेक्षा गडचिराेलीचे दुप्पट वीजबिल थकलेचंद्रपूर जिल्ह्याची लाेकसंख्या गडचिराेली जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. तसेच गावे माेठी असल्याने पथदिव्यांसाठी वापरही अधिक हाेते. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची पथदिव्यांची थकबाकी केवळ १९ काेटी ४९ लाख रुपये एवढी आहे, तर गडचिराेली जिल्ह्याची थकबाकी ३३ काेटी १४ लाख रुपये एवढी आहे. यावरून गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल भरले नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.

 

टॅग्स :electricityवीजbillबिल