शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पथदिव्यांच्या वीजबिलाचे 33 काेटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. 

ठळक मुद्देवर्षभर कराचा भरणाच नाही; ग्रामपंचायतींना महावितरणने धाडल्या नाेटीस

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ग्रामपंचायत, नगर परिषदा व नगर पंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलाचे सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपये थकले आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वसुली अभियान सुरू केले असून, थकीत वीजधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. याचा फटका पथदिव्यांनाही बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न अतिशय मर्यादित असल्याने या उत्पन्नातून पथदिव्यांचे वीजबिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य हाेत नाही. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी यापूर्वी जिल्हा परिषदेकडे हाेती. आता ही जबाबदारी राज्य शासनाकडे साेपविण्यात आली आहे. वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना नाेटीस पाठविल्या जात आहेत. मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिलाचा भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागून वीज वापराची माहिती पंचायत समितीकडे सादर करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात वीज बिल मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महावितरणचेही चुकले

घरगुती, वाणिज्य व औद्याेगिक ग्राहकांना दर महिन्याला वीजबिल पाठविले जाते. मात्र पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायतीला दर महिन्याला दिले जात नाही. त्यामुळे वर्षभर ग्रामपंचायत प्रशासनही वीजबिल भरण्याची प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करते. मार्च महिन्याच्या शेवटी महावितरणकडून नाेटीस पाठविली जाते. त्यानंतर वीजबिल भरण्याची प्रक्रिया सुरू हाेते. मात्र ही प्रक्रिया अतिशय लांब असल्याने मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिल भरले जात नाही. 

वीजबिल वसुलीतून प्राप्त हाेणाऱ्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के महसूल केवळ वीज खरेदीवर खर्च हाेते. उर्वरित रक्कम प्रशासन व इतर बाबींवर खर्च हाेते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते. नंतर वीजबिल देते. इतर सेवांमध्ये मात्र प्रथम पैसे माेजावे लागतात. नंतरच सेवा मिळते. याचा विचार करून नागरिकांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल वसुलीची माेहीम महावितरणने सुरू केली आहे. काेणत्याही प्रकारच्या ग्राहकाकडे वीजबिल थकले असल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल. - सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

चंद्रपूरपेक्षा गडचिराेलीचे दुप्पट वीजबिल थकलेचंद्रपूर जिल्ह्याची लाेकसंख्या गडचिराेली जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. तसेच गावे माेठी असल्याने पथदिव्यांसाठी वापरही अधिक हाेते. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची पथदिव्यांची थकबाकी केवळ १९ काेटी ४९ लाख रुपये एवढी आहे, तर गडचिराेली जिल्ह्याची थकबाकी ३३ काेटी १४ लाख रुपये एवढी आहे. यावरून गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल भरले नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.

 

टॅग्स :electricityवीजbillबिल