शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांच्या वीजबिलाचे 33 काेटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. 

ठळक मुद्देवर्षभर कराचा भरणाच नाही; ग्रामपंचायतींना महावितरणने धाडल्या नाेटीस

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ग्रामपंचायत, नगर परिषदा व नगर पंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजबिलाचे सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपये थकले आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वसुली अभियान सुरू केले असून, थकीत वीजधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. याचा फटका पथदिव्यांनाही बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न अतिशय मर्यादित असल्याने या उत्पन्नातून पथदिव्यांचे वीजबिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य हाेत नाही. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी यापूर्वी जिल्हा परिषदेकडे हाेती. आता ही जबाबदारी राज्य शासनाकडे साेपविण्यात आली आहे. वर्षभरात किती विजेचा वापर झाला, याची माहिती ग्रामपंचायत पंचायत समितीला सादर करते. पुढे ही माहिती जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे पाठविली जाते. मागील वर्षभरात अनेक ग्रामपंचायतीचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील पथदिव्यांची थकबाकी सुमारे ३३ काेटी १४ लाख रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी महावितरणने माेहीम सुरू केली आहे. या अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना नाेटीस पाठविल्या जात आहेत. मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिलाचा भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागून वीज वापराची माहिती पंचायत समितीकडे सादर करीत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात वीज बिल मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महावितरणचेही चुकले

घरगुती, वाणिज्य व औद्याेगिक ग्राहकांना दर महिन्याला वीजबिल पाठविले जाते. मात्र पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायतीला दर महिन्याला दिले जात नाही. त्यामुळे वर्षभर ग्रामपंचायत प्रशासनही वीजबिल भरण्याची प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करते. मार्च महिन्याच्या शेवटी महावितरणकडून नाेटीस पाठविली जाते. त्यानंतर वीजबिल भरण्याची प्रक्रिया सुरू हाेते. मात्र ही प्रक्रिया अतिशय लांब असल्याने मार्च महिन्याच्या पूर्वी वीजबिल भरले जात नाही. 

वीजबिल वसुलीतून प्राप्त हाेणाऱ्या एकूण महसुलापैकी ८५ टक्के महसूल केवळ वीज खरेदीवर खर्च हाेते. उर्वरित रक्कम प्रशासन व इतर बाबींवर खर्च हाेते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते. नंतर वीजबिल देते. इतर सेवांमध्ये मात्र प्रथम पैसे माेजावे लागतात. नंतरच सेवा मिळते. याचा विचार करून नागरिकांनी वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल वसुलीची माेहीम महावितरणने सुरू केली आहे. काेणत्याही प्रकारच्या ग्राहकाकडे वीजबिल थकले असल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल. - सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

चंद्रपूरपेक्षा गडचिराेलीचे दुप्पट वीजबिल थकलेचंद्रपूर जिल्ह्याची लाेकसंख्या गडचिराेली जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. तसेच गावे माेठी असल्याने पथदिव्यांसाठी वापरही अधिक हाेते. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची पथदिव्यांची थकबाकी केवळ १९ काेटी ४९ लाख रुपये एवढी आहे, तर गडचिराेली जिल्ह्याची थकबाकी ३३ काेटी १४ लाख रुपये एवढी आहे. यावरून गडचिराेली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने वर्षभर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल भरले नसल्याचे स्पष्ट हाेत आहे.

 

टॅग्स :electricityवीजbillबिल