कर्मचारी बेपत्ता नागरिकांच्या फेर्‍या

By Admin | Updated: June 9, 2014 23:37 IST2014-06-09T23:37:40+5:302014-06-09T23:37:40+5:30

येथील तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजता या कार्यालयाला भेट दिली

Roundabouts of missing employees | कर्मचारी बेपत्ता नागरिकांच्या फेर्‍या

कर्मचारी बेपत्ता नागरिकांच्या फेर्‍या

देसाईगंज येथील : तालुका भूमी अभिलेख कार्यालय
देसाईगंज : येथील तालुका उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजता या कार्यालयाला भेट दिली असता केवळ शिपायांच्या भरवशावर कार्यालय सुरू होते. मात्र कार्यालयातील खुच्र्या पंख्यांची हवा खात असताना आढळून आले. नागरिकांवर शुल्लक कामाकरिता १५-१५ दिवस फेर्‍या मारण्याची पाळी येत असल्याचे एका कामासाठी आलेल्या एका ग्रामीण भागातील नागरीकाने लोकमतशी बोलताना सांगितले.
शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. सकाळी १0 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ ठरविलेली आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांना ही वेळ लागू नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्यातील एकही दिवशी दुपारी २ वाजण्यापूर्वी येथील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. या कार्यालयाशी गाठ पडणार्‍या नागरिकांना कर्मंचार्‍यांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारला कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयातील १६ कर्मचार्‍यांपैकी २ महिला शिपाई, एक महिला दप्तरबंद व एक पूरूष सर्वेअर असे फक्त ४ कर्मचारी उपस्थित होते. मात्र इतर कर्मचारी अनुपस्थित असतांना देखील काही कर्मचारी दौर्‍यावर तर काही कर्मचारी मोजणीला गेले असल्याचे सांगीतले. येथील उपअधिक्षक केवळ महिण्यातून तीन ते चार दिवसच कार्यालयात उपस्थित राहत असल्याचे कामासाठी येणार्‍या नागरिकांचे म्हणणे आहे. मोजणीचे कित्येक प्रकरणे प्रलंबित असताना देखील कर्मचारी कार्यालयात उपस्थित का राहत नाहीत., असा अनेकांना प्रश्न  पडला आहे.  महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात १५ टक्के अधिक प्रोत्साहन भत्ता कर्मचार्‍यांना मिळतो. कर्मचारी मोठय़ा खुशीने येथील कार्यालयात बदली करून येण्यास तयार असतात. मात्र कार्यालयाला बुट्टी मारण्याची कोणतीच संधी कर्मचारी सोडत नाहीत. कामचुकारपणाच्या तक्रारी होउनही अधिकारी देखील पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या कार्यालयातील कित्येक कर्मचारी केवळ सही पुरते कार्यालयात येतात. नंतर लगेच दौर्‍यावर जातात. या कार्यालयातील कर्मचार्‍यांना दररोज दौरे असतातच कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.  जिल्ह्यातील अनेक तालुका मुख्यालयात कार्यालयांचा कारभार असाच सुरू आहे असाही  आरोप होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Roundabouts of missing employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.