शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

बीआरओअभावी रस्त्यांची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:05 IST

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२० वर्षे होते कार्यरत : कोट्यवधींची यंत्रसामुग्री धूळखात; परत काम देण्याची होत आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्ते निर्मितीचे काम ठप्प पडले आहे. एमआयडीसी परिसरात असलेली बीआरओची निवासस्थाने ओसाड पडली असून जेसीबी, ट्रक व इतर साहित्य अशी कोट्यवधी रूपयांची मालमत्ता धूळखात पडून आहे.जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षल्यांचा रस्ते, पूल व इतर विकास कामांना विरोध असल्याने ही विकास कामे करणाºया कंत्राटदाराचे साहित्य जाळत होते. परिणामी कंत्राटदार जिल्ह्यात काम करण्यास तयार नव्हते. भामरागड, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, अहेरी या तालुक्यातील जंगलव्याप्त गावांना रस्ते नव्हते. शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी बांधकाम करणारी यंत्रणा नसल्याने सदर निधी परत जात होता.दुर्गम भागात रस्ते तयार केल्यास दळणवळण वाढून या भागाचा विकास होईल, त्याचबरोबर नक्षल्यांच्या हालचालीवरही नियंत्रण ठेवता येईल, या उद्देशाने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात बीआरओची तुकडी १९९२ मध्ये पाठविले. या तुकडीचे मुख्यालय कोटगलजवळ एमआयडीसी परिसरात उभारून जिल्हाभरात रस्ते व पूल बांधकामाला सुरुवात केली. अनेक दुर्गम गावांपर्यंत मार्ग पोहोचविण्यात बीआरओने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बीआरओने बांधलेले रस्ते, पूल आजही शाबूत आहेत. रस्ते व पूल झाल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळून नक्षल चळवळीलाही हादरा बसला होता. मात्र अचानक शासनाने २०१३ मध्ये बीआरओचे स्थानांतरण अरूणाचल प्रदेशात केले. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्त्यांचे काम ठप्प पडले आहे. बीआरओच्या तुकडीला पुन्हा बोलवावे, अशी मागणी आहे.‘ते’ रस्ते व पूल अजूनही सुस्थितीतबीआरओ हा केंद्र शासनाचा विभाग आहे. बीआरओने केलेली सर्वच कामे दर्जात्मक होती. १५ ते २० वर्षांपूर्वी बांधलेली कामे अजूनही सुस्थितीत आहेत. बीआरओचे स्थानांतरण झाल्यानंतर विकास कामे ठप्प पडली आहेत. सद्य:स्थितीत काही कामे कंत्राटदारांच्या मार्फत केली जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा सुमार असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर बांधकाम न करताच कंत्राटदार पैसे उचलून मोकळे होत आहेत. याचा काही वाटा शासकीय अधिकाºयांनाही मिळत आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग असल्याने या भागात वरिष्ठ अधिकारी पोहोचत नाही. याचा दुरूपयोग आता कंत्राटदार व अधिकारी घेत आहेत.बीआरओ नक्षल्यांवर भारीनावावरूनच बीआरओ हा विभाग अतिशय कठीण ठिकाणी रस्ते बांधण्याचे काम करते. या विभागाकडे रस्ते व पूल बांधणारे सर्व तंत्रज्ञ, यंत्रसामुग्री तसेच संरक्षण यंत्रणा उपलब्ध आहे. बीआरओची ताकद नक्षल्यांवरही भारी पडत होती. परिणामी नक्षल्यांचे गड समजल्या जाणाºया गावांमध्ये बीआरओने पूल व रस्त्यांचे बांधकाम करूनही एक-दोन घटना वगळता नक्षल्यांनी कोणतीही विपरित घटना केली नाही. यावरून बीआरओ हे नक्षल्यांवर भारी पडले होते, असे दिसून येते.