शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बीआरओअभावी रस्त्यांची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:05 IST

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२० वर्षे होते कार्यरत : कोट्यवधींची यंत्रसामुग्री धूळखात; परत काम देण्याची होत आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्ते निर्मितीचे काम ठप्प पडले आहे. एमआयडीसी परिसरात असलेली बीआरओची निवासस्थाने ओसाड पडली असून जेसीबी, ट्रक व इतर साहित्य अशी कोट्यवधी रूपयांची मालमत्ता धूळखात पडून आहे.जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षल्यांचा रस्ते, पूल व इतर विकास कामांना विरोध असल्याने ही विकास कामे करणाºया कंत्राटदाराचे साहित्य जाळत होते. परिणामी कंत्राटदार जिल्ह्यात काम करण्यास तयार नव्हते. भामरागड, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, अहेरी या तालुक्यातील जंगलव्याप्त गावांना रस्ते नव्हते. शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी बांधकाम करणारी यंत्रणा नसल्याने सदर निधी परत जात होता.दुर्गम भागात रस्ते तयार केल्यास दळणवळण वाढून या भागाचा विकास होईल, त्याचबरोबर नक्षल्यांच्या हालचालीवरही नियंत्रण ठेवता येईल, या उद्देशाने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात बीआरओची तुकडी १९९२ मध्ये पाठविले. या तुकडीचे मुख्यालय कोटगलजवळ एमआयडीसी परिसरात उभारून जिल्हाभरात रस्ते व पूल बांधकामाला सुरुवात केली. अनेक दुर्गम गावांपर्यंत मार्ग पोहोचविण्यात बीआरओने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बीआरओने बांधलेले रस्ते, पूल आजही शाबूत आहेत. रस्ते व पूल झाल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळून नक्षल चळवळीलाही हादरा बसला होता. मात्र अचानक शासनाने २०१३ मध्ये बीआरओचे स्थानांतरण अरूणाचल प्रदेशात केले. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्त्यांचे काम ठप्प पडले आहे. बीआरओच्या तुकडीला पुन्हा बोलवावे, अशी मागणी आहे.‘ते’ रस्ते व पूल अजूनही सुस्थितीतबीआरओ हा केंद्र शासनाचा विभाग आहे. बीआरओने केलेली सर्वच कामे दर्जात्मक होती. १५ ते २० वर्षांपूर्वी बांधलेली कामे अजूनही सुस्थितीत आहेत. बीआरओचे स्थानांतरण झाल्यानंतर विकास कामे ठप्प पडली आहेत. सद्य:स्थितीत काही कामे कंत्राटदारांच्या मार्फत केली जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा सुमार असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर बांधकाम न करताच कंत्राटदार पैसे उचलून मोकळे होत आहेत. याचा काही वाटा शासकीय अधिकाºयांनाही मिळत आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग असल्याने या भागात वरिष्ठ अधिकारी पोहोचत नाही. याचा दुरूपयोग आता कंत्राटदार व अधिकारी घेत आहेत.बीआरओ नक्षल्यांवर भारीनावावरूनच बीआरओ हा विभाग अतिशय कठीण ठिकाणी रस्ते बांधण्याचे काम करते. या विभागाकडे रस्ते व पूल बांधणारे सर्व तंत्रज्ञ, यंत्रसामुग्री तसेच संरक्षण यंत्रणा उपलब्ध आहे. बीआरओची ताकद नक्षल्यांवरही भारी पडत होती. परिणामी नक्षल्यांचे गड समजल्या जाणाºया गावांमध्ये बीआरओने पूल व रस्त्यांचे बांधकाम करूनही एक-दोन घटना वगळता नक्षल्यांनी कोणतीही विपरित घटना केली नाही. यावरून बीआरओ हे नक्षल्यांवर भारी पडले होते, असे दिसून येते.