शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कुलगुरु हटाव, विद्यापीठ बचाव... संघटनांची जोरदार घोषणाबाजी, भरपावसात मोर्चा

By संजय तिपाले | Updated: August 19, 2023 13:53 IST

कडेकोट बंदोबस्तात पं.दीनदयाळ अध्यासनाचे उद्घाटन

गडचिरोली : कुलगुरु बोकारे हटाव, विद्यापीठ बचाव... नही चलेगी, नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी... पं. दीनदयाळ उपाध्याय अध्यासन केंद्र रद्द झालेच पाहिजे... अशी घोषणाबाजी करत १९ ऑगस्टला आदिवासी व बीआरएसपी संघटनेच्या वतीने भरपावसात गोंडवाना विद्यापीठावर मोर्चा काढला. दुसरीकडे कडेकोट बंदोबस्तात विद्यापीठ प्रशासनाने  पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाचा उद्घाटन कार्यक्रम उरकला.

गोंडवाना विद्यापीठात पं. दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाला आदिवासी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या विरोधानंतरही १९ ऑगस्टला नियोजित कार्यक्रम होईल अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली होती. दरम्यान, सकाळी ११ वाजता विद्यापीठात अध्यासनाचे उद्घाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर आदिवासी युवा परिषद व बीआरएसपी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा विद्यापीठावर धडकला. यावेळी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्यासह अधिसभा पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करुन रोष व्यक्त करण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चात अबालवृध्दांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.

भाजप, अभाविप पदाधिकाऱ्यांची गर्दी

या कार्यक्रमाला पत्रिका असलेल्यांनाच प्रवेश राहील, असा फतवा कुलगुरुंनी काढला होता. कार्यक्रमस्थळी मात्र, भाजप व अभाविप पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून आली. विद्यापीठ सर्वांसाठी खुले असल्याचा दावा पत्रकातून करणाऱ्या कुलगुरुंनी या कार्यक्रमात इतरांना डावलून भाजप व समविचारी संघटनांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले.  प्रेक्षकांपेक्षा बंदोबस्ताला पोलिस अधिक

दरम्यान, आदिवासी संघटनांनी विरोध केल्यामुळे विद्यापीठ प्रशासन धास्तावले होते. अगदी न्यायालय रस्त्यापासून ते विद्यापीठापर्यंत तीनवेळा तपासणी करुन नागरिकांना सोडले जात होते. मुख्य प्रवेशद्वार बंद होते, बाजूच्या प्रवेशद्वारावर पत्रिका असलेल्यांनाच पोलिस प्रवेश देत होते. अध्यासनाच्या उद्घाटनाला शंभर जण उपस्थित होते, बाहेर तेवढेच पोलिस बंदोबस्ताला होते.

संघविचार लादण्याचा खटाटोप

गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक इतिहासाशी पं. दीनदयाल उपाध्याय यांचा काडीचाही संबंध नाही, त्यांचे कुठले योगदान नाही, पण त्यांच्या नावाने गोंडवाना विद्यापीठात अध्यान केंद्र सुरु करुन विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार लादण्याचा खटाटोप केला आहे. मात्र, हे कदापि खपवून घेणार नाही. विद्यापीठ आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी आहे, तेथे अशा प्रकारचे छुपे अजेंडे चालणार नाहीत, यास आमचा कायम विरोध राहील.

- रोहिदास राऊत, आंदोलक

टॅग्स :Educationशिक्षणagitationआंदोलनuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली