शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

बोरियावासीयांची नक्षल्यांच्या त्रासातून झाली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:04 AM

भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले.

ठळक मुद्दे३९ नक्षलवादी ठार झाल्यामुळे गावकरी आनंदी : जेवण व इतर बाबींसाठी दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्याच्या किर्र जंगलात असलेला बोरिया हे गाव नक्षल्यांचे आश्रयस्थान बनले होते. जेवन व इतर कारणांसाठी नक्षलवादी येथील नागरिकांना नेहमीच त्रास देत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवादी ठार झाले. यामुळे बोरियावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून नक्षल्यांच्या खात्म्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असल्याचे दिसून येते.भामरागड तालुक्यातील बोरिया हे गाव इंद्रावती नदीजवळ आहे. छत्तीसगड राज्य व गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे येणे-जाणे वर्षभर सुरू राहत होते. सभोवताल घनदाट जंगल असल्याने नक्षल्यांसाठी बोरिया हे गाव रेस्ट झोन बनले होते. याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत होता. बºयाचवेळा बंदुकीच्या धाकावर जेवण मागितले जात होते. दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासींना नक्षल्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. अनेकदा नक्षल्यांची संख्या ५० ते १०० च्या जवळपास असल्यास संबंधित नागरिकांच्या घरचे संपूर्ण एक महिन्याचे धान्य दोन ते तीन दिवसांतच संपत होते. एखाद्या नागरिकाने घरची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केल्यास बंदुकीचे टोक त्याच्या छातीवर ठेवले जात होते. गावात रस्ता व इतर सुविधा झाल्यास नक्षल्यांचे वास्तव्य अडचणीत येण्याची शक्यता असल्याने या गावात रस्ते व इतर सुविधा निर्माण होऊ नये, यासाठी नक्षली नेहमीच प्रयत्न करीत होते. परिणामी शासनाच्या योजना अजूनही या गावापर्यंत पोहोचल्या नसल्याचे वास्तव प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर दिसून येते.नक्षल्यांकडून होणारी मारझोड, हिंसक कृत्यांमध्ये गावातील नागरिकांना बळजबरीने भाग घ्यायला लावणे, गावात नाचगाणे करायला लावणे यामुळे गावातील नागरिक कायम दहशतीखाली जीवन जगत होते. २२ व २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत सुमारे ३९ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यातील सर्वच नक्षलवादी पेरमिली दलमचे होते व ते बोरिया गावातील नागरिकांचा स्वत:साठी गैरवापर करीत होते. पोलीस दलाने सुमारे ३९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने या गावातील नक्षलवाद्यांचा वावर जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बोरिया गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून येत होते.नक्षल्यांच्या विरोधामुळेच गावाचा विकास रखडलाभामरागड तालुक्यातील अनेक गावे जंगलात वसली आहेत. या गावांमध्ये प्रशासनाने प्रयत्न करून विविध योजना पोहोचविल्या आहेत. मात्र बोरिया हे गाव नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन बनले होते. आपल्यापर्यंत पोलीस पोहोचू नये, यासाठी या गावात व गावाच्या जवळपास रस्ते निर्मितीस नक्षलवाद्यांचा नेहमीच विरोध राहिला होता.२२ एप्रिल रोजी बहुतांश नक्षलवादी ठार झाल्याची माहिती कळताच गावातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या अमानुष कृत्याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. या कारवाईमुळे या गावातील नक्षल्यांची दहशत संपणार आहे. त्यामुळे गावाचा विकास होण्यास मदत होईल.शहीद पोलिसांच्या कुटुंबियांनी २२ व २३ एप्रिलच्या घटनेबाबत सी-६० पोलीस जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी