शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

जुनी अरतताेंडी गावाचे पुनर्वसन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

जुनी अरततोंडी या गावाची लोकसंख्या सद्यस्थितीत अंदाजे ८०० च्या घरात असून, यापैकी ३०३ नागरिकांनी किन्हाळ्याजवळील पुनर्वसित ठिकाणी स्थलांतर केले ...

जुनी अरततोंडी या गावाची लोकसंख्या सद्यस्थितीत अंदाजे ८०० च्या घरात असून, यापैकी ३०३ नागरिकांनी किन्हाळ्याजवळील पुनर्वसित ठिकाणी स्थलांतर केले आहे. येथे घरासाठी व शेतीसाठी देण्यात आलेली जागा निरुपयोगी असल्यामुळे याठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांना अल्पावधीतच तडे जाऊ लागले आहेत, तर खडकाळ व निरुपयोगी शेतजमिनीमुळे जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सन १९९४ मध्ये लगतच्या गाढवी नदीला आलेल्या पुराने गावाला चारही बाजूंनी वेढल्याने येथील नागरिकांच्या जगण्या- मरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन स्थिती पाहता या गावाचे किन्हाळ्यानजीक पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी घर बांधकामासाठी ५० बाय ६० स्क्वेअर फूट जागा व २५ हजार रुपये कर्जाऊ स्वरूपात देण्यात आले होते. शेतीसाठी देण्यात आलेली जागा निकृष्ट व निरुपयोगी असल्याचे निदर्शनास आल्याने येथील नागरिकांनी आरमोरी तालुक्यातील पळसगावनजीकच्या बोरकनार या परिसरात घरासाठी व शेतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली व याठिकाणी पुनर्वसन करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, प्रशासकीय यंत्रणेने वन विभागाच्या जागेत पुनर्वसन करण्यास नकार दिला. दरम्यान, नागरिकांनी नवीन ठिकाणी जाण्यास स्पष्ट नकार देत जुन्याच ठिकाणी वास्तव्यास राहून पूर्वापर शेतीच्या भरवशावरच उदरनिर्वाह करीत आहेत.