शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून!

By संजय तिपाले | Published: September 29, 2023 11:17 AM

उमेदवारांमध्ये संभ्रम : निकालाकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड

संजय तिपाले

गडचिरोली : येथील गाेंडवाना विद्यापीठात सहायक प्राध्यापकांच्या ३० जागांसाठी भरती प्रक्रिया झाली; परंतु, निवड झालेल्यांना थेट मेल पाठवून गुड न्यूज देण्यात आली. निकाल जाहीर झाल्यावर विद्यापीठाने नोटिफिकेश न काढल्याने इतर उमेदवारांमध्ये संभ्रम कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया जाहिरात देऊन केली; पण रुजू करून घेताना बाळगलेल्या गोपनीयतेमुळे निकालाकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांचा मोठा हिरमोड झाला आहे.

राज्यात सर्व विद्यापीठांत भरती प्रक्रिया बंद आहे. मात्र, एकमेव गोंडवाना विद्यापीठात भरतीला मान्यता मिळाली. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार मराठी, इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, जनसंवाद, अर्थशास्त्र, व्यवस्थापनाशस्त्र आदी विषयांसाठी सहायक प्राध्यापकांच्या निवडी करायच्या होत्या. पदभरतीच्या जाहिरातीनुसार एससी १, व्हीजे-ए १, एनटी-बी १, एनटी-सी २, एनटी-डी १, एसबीसी १, ओबीसी ९, ईडब्लूएस ३ व खुला ११ अशा जागा होत्या. यासाठी बाराशेपेक्षा अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते. जुलै महिन्यात मुलाखती पार पडल्या.

मराठीसाठी उत्तर प्रदेशच्या उमेदवाराची भरती

  • सहायक प्राध्यापक भरतीत पदव्युत्तर अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ असलेल्या उच्चविद्याविभूषित चार उमेदवार होते; परंतु, त्यापैकी एकालाही रुजू होण्याबाबत मेल आला नाही.
  • विशेष म्हणजे, मराठी विषयासाठी निवड केलेला एक उमेदवार मूळचा उत्तर प्रदेशचा आहे, त्यामुळे उमेदवारांमध्ये शंका- कुशंका निर्माण झाल्या आहेत.
  • तब्बल दोन महिन्यांनी निवड समितीने निवडलेल्या उमेदवारांना थेट मेल पाठवून बोलावले व रुजू करून घेतले. मात्र, भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याबाबत कोणतीही सूचना संकेतस्थळावर दिली नाही, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

विषयतज्ज्ञ म्हणतात, विद्यापीठालाच विचारा

यासंदर्भात दोन विषयतज्ज्ञांना संपर्क केला असता एका तज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर विषयतज्ज्ञांनी गुण दिलेले उमेदवार रुजू करून घेतले नाही, मग आणखी वेगळे निकष लावून गुणांकन केले असेल तर माहीत नाही, विद्यापीठालाच विचारा, असे उत्तर दिले. दुसरे विषयतज्ज्ञ म्हणाले, अंतिम निवड कोणाची केली, हे मला माहिती नाही, आम्ही फक्त योग्य ते गुणांकन केले.

उमेदवार म्हणतात...

मराठी विषयासाठी मी मुलाखत दिली होती. विषयतज्ज्ञांनी मला क्रमांक एकचे गुणांकन दिले होते; परंतु, मला मेल आला नाही. कोणी तरी दुसरेच रुजू झाल्याचे कळाल्यावर मला तर धक्काच बसला.

- एक उमेदवार

जनसंवादसाठी माझी मुलाखत चांगली झाली होती. तज्ज्ञांनी चांगले गुण दिले होते. मला ना मेल आला ना कॉल, त्यामुळे आश्चर्य वाटले. भरती पारदर्शक आहे तर निकाल जाहीर करणे अपेक्षित होते.

- एक उमेदवार

ज्यांची निवड झाली त्यांना नाही तर कोणाला मेल पाठवायचे होते. विद्यापीठ अनुदान आयोगाने निवड यादी लावणे बंधनकारक केलेले नाही. विषय तज्ज्ञांनी गुणांकन केल्यानंतर आणखी वेगळे निकष लावले किंवा नाही, याबाबत मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही.

- डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ

टॅग्स :Educationशिक्षणProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली