शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

रवींद्रबाबा चौकशीला आलेच नाही

By admin | Updated: March 12, 2016 01:32 IST

रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ...

चितळ शिकार प्रकरण : चार आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीअहेरी : रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे नेते रवींद्रबाबा आत्राम यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी दिले होते. मात्र रवींद्रबाबा आत्राम शुक्रवारी दिवसभर वन विभागाकडे चौकशीसाठी फिरकले नाही. ते फरार असून या प्रकरणात पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेले आनंदराव लचमा तोरेम (३२) रा. दोडेपल्ली व बुधवारी, गुरूवारी वन विभागाने चितळाचे मांस खरेदी केले म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केलेले दीपक सडमेक (३०), दिवाकर सडमेक (३२) रा. दोडेपल्ली, नारायण मडावी (४०) रा. रामपूर व किंटू पेंदाम (२८) रा. दोडेपल्ली या चौघांना शुक्रवारी अहेरी न्यायालयात सायंकाळी ५ वाजता हजर केले. न्यायालयाने या पाच आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरी मंगळवारी धाड घालण्यात आली. या धाडीत सात बंदुका व वन्य प्राण्यांची शिंगे, मांसाचे तुकडे वन विभागाने जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी आता वन विभागाला शिकस्त करावी लागणार आहे. एकूणच राजकीय गोट्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून आत्राम परिवार अडचणीत आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)चार दिवसानंतर तपास अधिकारी आलापल्लीत दाखलआलापल्ली : अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली येथे रविवारी चितळ शिकार प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पाच आरोपी अटक करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम पसार आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल आहेत. घटना घडल्यापासून सलग तीन दिवस ते बैठकांमुळे आलापल्ली मुख्यालयात नव्हते. शुक्रवारी ते येथे परतले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मंदावलेली तपासाची गती आता पुन्हा वेग पकडण्याची शक्यता असून वन विभागाच्या या थंड तपासामुळे फरार असणाऱ्या आरोपींना नव्या पळवाटा मिळू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीबाबतचे कायदे अतिशय कडक असून या कायद्यात नमूद बाबीचा विचार करता, सहायक वन संरक्षक दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा सर्व तपास सहायक वनसंरक्षक आर. एम. अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला होता. हे मंगळवारपासून सलग तीन दिवस कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेरगावी होते. त्यामुळे या चितळ शिकार प्रकरणाच्या तपासाला फारशी गती मिळू शकली नाही. आलापल्ली व अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी आपल्या स्तरावर काय तो तपास करीत होते. मात्र जे या प्रकरणाचे चौकशी अधिकारी आहे, ते आऊट आॅफ आलापल्ली असल्याने फरार आरोपी यातून आपली सुटका कशी करून घेता येईल, याचे आराखडे बांधत सुटकेचे अनेक मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी अग्रवाल हे आलापल्लीत दाखल झाले असून आता तरी तपासाला गती मिळेल, अशी आशा आहे. तपासातील या थंड गतीबाबत आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांना विचारणा केली असता, या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. दोन वन परिक्षेत्राधिकारी पाहत आहेत. मी ही या प्रकरणाची माहिती घेत आहे, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)