शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

रवींद्रबाबा चौकशीला आलेच नाही

By admin | Updated: March 12, 2016 01:32 IST

रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ...

चितळ शिकार प्रकरण : चार आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीअहेरी : रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे नेते रवींद्रबाबा आत्राम यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी दिले होते. मात्र रवींद्रबाबा आत्राम शुक्रवारी दिवसभर वन विभागाकडे चौकशीसाठी फिरकले नाही. ते फरार असून या प्रकरणात पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेले आनंदराव लचमा तोरेम (३२) रा. दोडेपल्ली व बुधवारी, गुरूवारी वन विभागाने चितळाचे मांस खरेदी केले म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केलेले दीपक सडमेक (३०), दिवाकर सडमेक (३२) रा. दोडेपल्ली, नारायण मडावी (४०) रा. रामपूर व किंटू पेंदाम (२८) रा. दोडेपल्ली या चौघांना शुक्रवारी अहेरी न्यायालयात सायंकाळी ५ वाजता हजर केले. न्यायालयाने या पाच आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरी मंगळवारी धाड घालण्यात आली. या धाडीत सात बंदुका व वन्य प्राण्यांची शिंगे, मांसाचे तुकडे वन विभागाने जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी आता वन विभागाला शिकस्त करावी लागणार आहे. एकूणच राजकीय गोट्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून आत्राम परिवार अडचणीत आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)चार दिवसानंतर तपास अधिकारी आलापल्लीत दाखलआलापल्ली : अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली येथे रविवारी चितळ शिकार प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पाच आरोपी अटक करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम पसार आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल आहेत. घटना घडल्यापासून सलग तीन दिवस ते बैठकांमुळे आलापल्ली मुख्यालयात नव्हते. शुक्रवारी ते येथे परतले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मंदावलेली तपासाची गती आता पुन्हा वेग पकडण्याची शक्यता असून वन विभागाच्या या थंड तपासामुळे फरार असणाऱ्या आरोपींना नव्या पळवाटा मिळू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीबाबतचे कायदे अतिशय कडक असून या कायद्यात नमूद बाबीचा विचार करता, सहायक वन संरक्षक दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा सर्व तपास सहायक वनसंरक्षक आर. एम. अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला होता. हे मंगळवारपासून सलग तीन दिवस कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेरगावी होते. त्यामुळे या चितळ शिकार प्रकरणाच्या तपासाला फारशी गती मिळू शकली नाही. आलापल्ली व अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी आपल्या स्तरावर काय तो तपास करीत होते. मात्र जे या प्रकरणाचे चौकशी अधिकारी आहे, ते आऊट आॅफ आलापल्ली असल्याने फरार आरोपी यातून आपली सुटका कशी करून घेता येईल, याचे आराखडे बांधत सुटकेचे अनेक मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी अग्रवाल हे आलापल्लीत दाखल झाले असून आता तरी तपासाला गती मिळेल, अशी आशा आहे. तपासातील या थंड गतीबाबत आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांना विचारणा केली असता, या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. दोन वन परिक्षेत्राधिकारी पाहत आहेत. मी ही या प्रकरणाची माहिती घेत आहे, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)