शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रवींद्रबाबा चौकशीला आलेच नाही

By admin | Updated: March 12, 2016 01:32 IST

रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ...

चितळ शिकार प्रकरण : चार आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीअहेरी : रविवारी अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली येथील चितळ शिकार प्रकरणात मुख्य संशयित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे नेते रवींद्रबाबा आत्राम यांना चौकशीसाठी ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी दिले होते. मात्र रवींद्रबाबा आत्राम शुक्रवारी दिवसभर वन विभागाकडे चौकशीसाठी फिरकले नाही. ते फरार असून या प्रकरणात पहिल्याच दिवशी अटक करण्यात आलेले आनंदराव लचमा तोरेम (३२) रा. दोडेपल्ली व बुधवारी, गुरूवारी वन विभागाने चितळाचे मांस खरेदी केले म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केलेले दीपक सडमेक (३०), दिवाकर सडमेक (३२) रा. दोडेपल्ली, नारायण मडावी (४०) रा. रामपूर व किंटू पेंदाम (२८) रा. दोडेपल्ली या चौघांना शुक्रवारी अहेरी न्यायालयात सायंकाळी ५ वाजता हजर केले. न्यायालयाने या पाच आरोपींना २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरी मंगळवारी धाड घालण्यात आली. या धाडीत सात बंदुका व वन्य प्राण्यांची शिंगे, मांसाचे तुकडे वन विभागाने जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी आता वन विभागाला शिकस्त करावी लागणार आहे. एकूणच राजकीय गोट्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा असून आत्राम परिवार अडचणीत आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)चार दिवसानंतर तपास अधिकारी आलापल्लीत दाखलआलापल्ली : अहेरी तालुक्याच्या दोडेपल्ली येथे रविवारी चितळ शिकार प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पाच आरोपी अटक करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम पसार आहेत. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल आहेत. घटना घडल्यापासून सलग तीन दिवस ते बैठकांमुळे आलापल्ली मुख्यालयात नव्हते. शुक्रवारी ते येथे परतले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मंदावलेली तपासाची गती आता पुन्हा वेग पकडण्याची शक्यता असून वन विभागाच्या या थंड तपासामुळे फरार असणाऱ्या आरोपींना नव्या पळवाटा मिळू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीबाबतचे कायदे अतिशय कडक असून या कायद्यात नमूद बाबीचा विचार करता, सहायक वन संरक्षक दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी या प्रकरणाचा तपास करू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा सर्व तपास सहायक वनसंरक्षक आर. एम. अग्रवाल यांच्याकडे देण्यात आला होता. हे मंगळवारपासून सलग तीन दिवस कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेरगावी होते. त्यामुळे या चितळ शिकार प्रकरणाच्या तपासाला फारशी गती मिळू शकली नाही. आलापल्ली व अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी आपल्या स्तरावर काय तो तपास करीत होते. मात्र जे या प्रकरणाचे चौकशी अधिकारी आहे, ते आऊट आॅफ आलापल्ली असल्याने फरार आरोपी यातून आपली सुटका कशी करून घेता येईल, याचे आराखडे बांधत सुटकेचे अनेक मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी अग्रवाल हे आलापल्लीत दाखल झाले असून आता तरी तपासाला गती मिळेल, अशी आशा आहे. तपासातील या थंड गतीबाबत आलापल्लीचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांना विचारणा केली असता, या प्रकरणाचे चौकशी अधिकारी कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. दोन वन परिक्षेत्राधिकारी पाहत आहेत. मी ही या प्रकरणाची माहिती घेत आहे, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)