शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाच तालुक्यांकडे पावसाची वक्रदृष्टी; राेवणी खाेळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 5:00 AM

गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते.  यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली.

ठळक मुद्देसरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही पडला कमी पाऊस; केवळ सिंचनाची साेय असलेल्याच शेतकऱ्यांनी आटाेपली कामे

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यातील गडचिराेली, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, धानाेरा या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तर पावसाने दडीच मारली असल्याने जिल्ह्यात काेरडा दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. गडचिराेली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२५४ मिमी पाऊस पडते. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची लागवड करीत असल्याचे दिसून येते. यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे शेती मशागतीची कामे अगदी वेळेवर आटाेपली. आता मात्र राेवण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी राेवणी केली त्यांचे धान करपण्याचा धाेका निर्माण झाला आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात ४४५.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र प्रत्यक्षात केवळ ४०१.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. सिराेंचा व देसाईगंज या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. उर्वरित दहा तालुक्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.सिचंनाची साधने असलेले शेतकरी तसेच नदी, नाल्यालगत शेती असलेले शेतकरी धान राेवणीचे काम करीत आहेत. परंतु काेरडवाहू शेतकऱ्यांना अद्यापही जाेरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.  

राेवणीची कामे पडली ठप्प - आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात आहे अशा शेतकऱ्यांनी धान रोहिणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांद्यांमधील पाणी आटायला सुरुवात झाली आहे. परिणामी रोहिणीची कामे रखडली आहेत. धान लावणीच्या कामाला उशीर झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.- यावर्षी माेठा पाऊस अजूनही झाला नाही. एखादी तास पाऊस पडल्यानंतर लगेच ऊन निघते. त्यामुळे तापमान वाढत आहे. पाऊस व कडक ऊन यामुळे उकाड्यात वाढ आहे. दिवसा व रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

जलसाठे अर्धे रिकामेचजिल्ह्यात अजूनही माेठा पाऊस झाला नाही. त्यामुळे तलावाच्या जलसाठ्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. मागील वर्षी जेवढा पाणीसाठा हाेता. त्यात थाेडी वाढ झाली आहे. तर जे जलसाठे पावसाळ्यापूर्वी काेरडे हाेते. ते आताही काेरडेच आहेत. विशेषकरून दरवर्षी उन्हाळ्यात बाेड्या काेरड्या पडतात. त्या आताही काेरड्याच आहेत. जाेपर्यंत जलसाठे भरत नाही. ताेपर्यंत उत्पादनाही हमी राहत नसल्याने शेतकरी समाधानी राहत नाही. 

 

टॅग्स :Rainपाऊस