शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पावसाने गाठली सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील तलाव भरले तुडूंब : आठ तालुक्यांमध्ये मात्र अजुनही कमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अपेक्षित सरासरीची कसर भरून काढली असून २३ आॅगस्टपर्यंत जिल्हयात अपेक्षित पावसाच्या ९९.९ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी सुरूवातीला अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळेच रोवणीची कामे रखडली होती. शेतकरी चिंतेत पडला असतानाच १० दिवसांपूर्वी राज्यभरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कमी पडलेल्या पावसाची कसर भरून निघाली आहे. २३ ऑगस्टपर्यंत जिल्हाभरात ९५५.२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ९५४.५ मिमी पाऊस झाला आहे. अजुनही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवस पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास अपेक्षित सरासरीच्या अधिकचे पाऊस पडू शकते.जिल्ह्यात आता रोवणीची कामे आटोपली असून निंदनाची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडते. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते. धानपिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. अशा वेळी तलाव, बोड्यांमधील पाणी धान पिकाला दिले जाते. मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे तललाव, बोड्या पूर्णपणे भरल्या आहेत. पाऊस सुरूच असल्याने पुन्हा १५ दिवस तलाव, बोड्यांच्या पाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर मात्र तलावबोड्या भरल्या असल्याने शेतकरी निश्चिंत आहेत.देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी पाऊसयावर्षी देसाईगंज तालुक्यात सर्वात कमी म्हणजे, केवळ ६९१.३ मिमी पाऊस पडला आहे. या तालुक्यात २३ ऑगस्टपर्यंत ९८६.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ६९१.३ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित सररासरीच्या ७०.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. धानोरा तालुक्यात केवळ ७३९ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या ६९.२ टक्के एवढा आहे. गडचिरोली तालुक्यात ११०१.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७५५.४ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. अपेक्षित सरासरीच्या केवळ ६८.६ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. कुरखेडा तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या ८७.५, आरमोरी ७९.७,चामोर्शी ९५.४, एटापल्ली ९४.२, कोरची ६९.२, देसाईगंज ७०.१ मिमी पाऊस झाला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक १३६२.६ मिमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प