शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

'मेडिगड्डा'वरुन राहुल गांधी 'केसीआर'वर बरसले; सिंचनाच्या नावाखाली जनतेची लूट केल्याचा आरोप

By संजय तिपाले | Updated: November 2, 2023 12:57 IST

तडे गेलेल्या पुलाची पाहणी : कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

गडचिरोली : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वात कळीचा मुद्दा बनलेल्या महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाला २ नोव्हेंबर रोजी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी तेलंगणा केसीआर सरकारवर तोफ डागली. सिंचनाच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची लूट केली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणावरील एक किलोमीटर लांब असलेल्या पुलाचे तीन खांब खचले होते, त्यामुळे महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा हा मार्ग आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पूल खचल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले. भाजप व काँग्रेसने केसीआर यांच्यावर टीकेची झोड उठवत या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) धरणाला भेट दिली. तेलंगणात प्रचार दौऱ्यावर असलेले राहुल गांधी हैदराबादहून हेलिकॉप्टरने जयशंकर भूपालपल्ली येथील आंबटपल्ली गावातून धरणावर पोहोचले. यावेळी त्यांनी तडे गेलेल्या पुलाची पाहणी केली. तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, विधिमंडळ नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, आमदार श्रीधर बाबू आणि इतर नेते त्यांच्यासमवेत होते.

महिलांशी साधला संवाद

बॅरेजला भेट देण्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील आंबटपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित केले. त्यांनी केसीआर सरकारचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून कालेश्वरमचे वर्णन केले. “मला हे वैयक्तिकरित्या पहायचे होते आणि म्हणूनच मी येथे आलो आहे,” असे ते म्हणाले. या प्रकल्पात मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणातील जनतेकडून एक लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. तर, या प्रकल्पाचा लोकांना फायदा झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.

 खोचक टीका, म्हणाले, हे तर कालेश्वर केसीआर एटीएम

या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उभारलेल्या 'कालेश्वरम एटीएम'कडे बोट दाखवत राहुल गांधी यांनी 'कालेश्वरम केसीआर एटीएम' असे नामकरण करण्याची सूचना करुन खोचक टीका केली.  काँग्रेसची सत्ता आल्यास केसीआर व त्यांच्या कुटुंबीयांनी या धरणात केलेल्या गैरव्यवहाराची रक्कम जनतेला परत मिळवून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरणGadchiroliगडचिरोली