शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार ७३५ नागरिकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही.

ठळक मुद्दे२,८७३ अजूनही निरीक्षणाखाली : एकूण १६ हजार ६०८ नागरिक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या एकूण १६ हजार ६०८ नागरिकांपैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. उर्वरित २ हजार ८७३ नागरिकांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण व्हायचा आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला होम क्वॉरंटाईन ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या नागरिकांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होते. यापैकी १३ हजार ७३५ नागरिकांनी १४ दिवसांचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यापैकी एकही नागरिक सद्य:स्थितीत पॉझिटीव्ह आढळला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून आलेला, मात्र होम क्वॉरंटाईनसाठी नोंदणी न करताच एखादा नागरिक गावात फिरत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळवावी. सामान्य व्यक्तीला आजाराची लक्षणे दिसून आली नसली तरी त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये. अचानक आजारी अथवा आरोग्यविषयक तक्रारी असल्यास त्यांनी आपली माहिती जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाचा प्रसार थांबविण्याबाबत आशा वर्कर व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. इतरही विभागांचे अधिकारी व कर्मचाºयांनीही स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या कार्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अजुनही नियंत्रणात आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यांनी पुढे केला मदतीचा हातगडचिरोली येथील अभिलाष चुटे यांनी १ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. तसेच गडचिरोली येथील विजय चौधरी यांनी २५ हजार रुपये, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी २५ हजार रुपये, आरमोरी येथील प्रविण राहाटे यांनी ३ हजार रुपये तसेच फुले दाम्पत्य प्रतिष्ठान गडचिरोलीतफे १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द केला. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार आहे. अडचणीच्या कालावधीत दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गर्दीचे कार्यक्रम घेतल्यास आयोजकावर गुन्हाकोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नसून सण, उत्सव घरीच साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोणी गर्दी होणारा एखादा कार्यक्रम घेतला तर आयोजकावर गुन्हा दाखल होईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.येत्या काळात हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महात्मा फुले जयंती, इस्टर संडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व इतर काही सार्वजनिक उत्सवाचे कार्यक्रम येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण कायदा व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घरीच उत्सव साजरे करावे, याबाबत धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे. कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी गर्दी झाल्यास आयोजकासह त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कोणालाही कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे कार्यक्रम घेण्याकरिता प्रशासनाकडे मागणी करू नये. सर्व स्तरावर संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.गरजूंची माहिती तहसीलदारांना द्यासंचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू न मिळाल्याने एखादे कुटुंब किंवा नागरिक अडचणीत असेल तर याबाबतची माहिती संबंधित तहसीलदारांना द्यावी. तसेच जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या मदत केंद्रावरही संपर्क साधून अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस