जलसुरक्षकांना दिले शुद्ध पाण्याचे धडे
By Admin | Updated: July 5, 2014 00:47 IST2014-07-05T00:47:46+5:302014-07-05T00:47:46+5:30
पावसाळ्यामध्ये जलसाठे अशुद्ध झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना...

जलसुरक्षकांना दिले शुद्ध पाण्याचे धडे
गडचिरोली : पावसाळ्यामध्ये जलसाठे अशुद्ध झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक आजार होतात. हे लक्षात घेऊन जलसुरक्षकांना डॉक्टरांनी पाणी शुद्धीकरणाचे धडे दिले.
पंचायत समितीचा पाणी, स्वच्छता विभाग, पाणी गुणवत्ता संयनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सविता कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ताराम, डॉ. बिडपल्लीवार, पोर्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. करेवार, एस. वाय. सोरते, आरोग्य पर्यवेक्षक रासेकर, आरोग्य सहाय्यक नवघरे, पाणीपुरवठा विभागाचे पाणी गुणवत्ता निरीक्षक कोडापे, प्राशिश कोडबत्तुवार, विस्तार अधिकारी के. जी. बोप्पनवार, पंचायत समिती सदस्य वसंतराव गायकवाड, एल. बी. जुवारे आदी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण, सांकेतांक देणे, जलसुरक्षकाच्या जबाबदाऱ्या, शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे, टीसीएल पावडरचे महत्व, साठवणूक, साथीच्या आजारावर करावयाच्या उपाययोजना आदींबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
ग्रामसेवक व जलसुरक्षकांनी नियमित पाणी शुद्धीकरण व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देऊन आपले कर्तव्य जाबाबदाऱ्या नियमितपणे पार पाडाव्यात, जनसामान्यांनी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची देखभाल करावी, परिसरात स्वच्छता करावी, विहीर, हातपंप व पाण्याच्या टाकीमध्ये वेळेवर पाणी शुद्ध करणारे पावडर टाकावे, पाण्याची टाकी वेळोवेळी साफ करावी, असे मार्गदर्शन संवर्ग विकास अधिकारी कुत्तीरकर यांनी केले. संचालन समूह समन्वयक प्रदीप बारई यांनी केले. कार्यशाळेला जलसुरक्षक व ग्रामसेवक उपस्थित होते.