क्वॉरंटाईन नागरिकांना सोयीसुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:33+5:30
चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २३ मजूर व नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून तेलंगणा राज्यातून ७ हजार मजूर परत आलेले आहेत. यापैकी १७५ जिल्हाबाहेरील असून १८३ परराज्यातील नागरिक आहेत, अशी माहिती एसडीओ तोडसाम यांनी दिली. चामोर्शी नगर पंचायतअंतर्गत ३०० मजूर असून त्यांना शिवाजी हायस्कूल व जि.प. केंद्र शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

क्वॉरंटाईन नागरिकांना सोयीसुविधा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मिरची तोडण्याच्या कामासाठी आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात गेलेले मजूर चामोर्शी तालुक्यात परतले असून त्यांना गावातच क्वॉरंटाईन करण्यात आले. त्या नागरिकांना भोजनासह सर्व सोयीसुविधा प्रशासनाने पुरवाव्या, अशा सूचना खा.अशोक नेते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खा.नेते यांनी बुधवारी चामोर्शी येथील उपविभागीय कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोनाची सद्यस्थिती व माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार संजय गंगथळे, ठाणेदार जितेंद्र बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण लायबल, तालुका कृषी अधिकारी डांगे, बीडीओ माने, मुख्याधिकारी सतीश चौधरी तसेच माजी जि.प.अध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजपचे जिल्हा सचिव आनंद भांडेकर, आनंद गण्यारपवार, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
चामोर्शी तालुक्यात आतापर्यंत ६ हजार २३ मजूर व नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून तेलंगणा राज्यातून ७ हजार मजूर परत आलेले आहेत. यापैकी १७५ जिल्हाबाहेरील असून १८३ परराज्यातील नागरिक आहेत, अशी माहिती एसडीओ तोडसाम यांनी दिली. चामोर्शी नगर पंचायतअंतर्गत ३०० मजूर असून त्यांना शिवाजी हायस्कूल व जि.प. केंद्र शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. चामोर्शी येथे शिवभोजन थाळीची क्षमता वाढवावी, एमआरईजीएसची कामे सुरू करून मजुरांना रोजगार द्यावा, नवीन कामे सुरू करावे, रस्ते व पाणीपुरवठ्याची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना खा.नेते यांनी अधिकाºयांना दिली.