शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘इंद्रावती’वरील पूल विरोधकांचे आंदोलन सुरूच; ४ जानेवारीपासून ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:42 IST

दोन आठवड्यांपासून छत्तीसगडच्या हद्दीत नदीतीरावर मुक्काम, भाकपाचाही पाठिंबा

गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला विभागणाऱ्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड प्रशासनाकडून उभारल्या जात असलेल्या पुलाला विरोध करण्यासाठी छत्तीसगड हद्दीत गेल्या ४ जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. लगतच्या गावांमधील लोक नदीकाठी ठिय्या देऊन असून तिथेच त्यांनी तात्पुरती राहुटी केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या आंदोलनाला एटापल्ली तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

छत्तीसगड सीमेतील बिजापूर जिल्ह्याच्या नुगूर या गावाजवळ इंद्रावती नदीवर पुलाची उभारणी होत आहे. हा भाग अनेक वर्षांपासून नक्षल्यांचा गड समजला जातो. त्यामुळे छत्तीसगड प्रशासनाकडून पोलिस संरक्षणात हे काम सुरू होते. मात्र, त्या भागातील नागरिकांना त्या परिसरात वर्दळ आणि बाहेरील लोकांचा हस्तक्षेप नको आहे. अबुझमाड क्षेत्रातील खनिज काढण्यासाठीच प्रशासनाकडून रस्ते, पुलांची निर्मिती केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. यामुळे जल, जंगल, जमिनीवरील आदिवासींचा हक्क हिरावला जाईल, असा त्यांना संशय आहे. छत्तीसगड प्रशासनाला त्यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिले. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे एटापल्ली तालुका भाकपाचे सचिन मोतकुरवार यांनी कळविले आहे.

शासनाने आतापर्यंत त्या भागात रुग्णालय, शाळा, अंगणवाडी, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या नसल्याचा आरोप छत्तीसगड प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

हे आंदोलन महाराष्ट्राच्या हद्दीत नाही. महाराष्ट्राच्या हद्दीतील लोक जर त्यात सहभागी असतील तर त्यांची समजूत काढली जाईल आणि विकासाला चालना देण्यासाठी पुलाचे बांधकाम का गरजेचे आहे हे त्यांना सांगितले जाईल.

- शुभम गुप्ता, उपविभागीय अधिकारी, एटापल्ली.

टॅग्स :agitationआंदोलनriverनदीGadchiroliगडचिरोली