शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘इंद्रावती’वरील पूल विरोधकांचे आंदोलन सुरूच; ४ जानेवारीपासून ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:42 IST

दोन आठवड्यांपासून छत्तीसगडच्या हद्दीत नदीतीरावर मुक्काम, भाकपाचाही पाठिंबा

गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याला विभागणाऱ्या इंद्रावती नदीवर छत्तीसगड प्रशासनाकडून उभारल्या जात असलेल्या पुलाला विरोध करण्यासाठी छत्तीसगड हद्दीत गेल्या ४ जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. लगतच्या गावांमधील लोक नदीकाठी ठिय्या देऊन असून तिथेच त्यांनी तात्पुरती राहुटी केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या आंदोलनाला एटापल्ली तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

छत्तीसगड सीमेतील बिजापूर जिल्ह्याच्या नुगूर या गावाजवळ इंद्रावती नदीवर पुलाची उभारणी होत आहे. हा भाग अनेक वर्षांपासून नक्षल्यांचा गड समजला जातो. त्यामुळे छत्तीसगड प्रशासनाकडून पोलिस संरक्षणात हे काम सुरू होते. मात्र, त्या भागातील नागरिकांना त्या परिसरात वर्दळ आणि बाहेरील लोकांचा हस्तक्षेप नको आहे. अबुझमाड क्षेत्रातील खनिज काढण्यासाठीच प्रशासनाकडून रस्ते, पुलांची निर्मिती केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. यामुळे जल, जंगल, जमिनीवरील आदिवासींचा हक्क हिरावला जाईल, असा त्यांना संशय आहे. छत्तीसगड प्रशासनाला त्यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिले. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे एटापल्ली तालुका भाकपाचे सचिन मोतकुरवार यांनी कळविले आहे.

शासनाने आतापर्यंत त्या भागात रुग्णालय, शाळा, अंगणवाडी, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या नसल्याचा आरोप छत्तीसगड प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

हे आंदोलन महाराष्ट्राच्या हद्दीत नाही. महाराष्ट्राच्या हद्दीतील लोक जर त्यात सहभागी असतील तर त्यांची समजूत काढली जाईल आणि विकासाला चालना देण्यासाठी पुलाचे बांधकाम का गरजेचे आहे हे त्यांना सांगितले जाईल.

- शुभम गुप्ता, उपविभागीय अधिकारी, एटापल्ली.

टॅग्स :agitationआंदोलनriverनदीGadchiroliगडचिरोली